Kumbh Mela 1954 stampede Congress government : २९ जानेवारी २०२५ रोजी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेवरून विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली आणि त्याचे पडसाद संसदेतही उमटले. मात्र, कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी १९५४ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिला कुंभमेळा अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे आयोजित करण्यात आला होता. या भव्य कुंभमेळ्याला प्रमुख राजकीय व्यक्तींसह ४० लाखांहून अधिक यात्रेकरूंनी हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत शेकडो भाविकांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ३५०-४०० होती, परंतु अंदाजानुसार ही संख्या ८०० पर्यंत पोहोचली होती. १९५४ च्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला होता. गांधीवादी विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक जे. बी. कृपलानी यांनी त्याचवर्षी १७ फेब्रुवारी रोजी सभागृहात हा मुद्दा मांडला. त्यावेळी केंद्रात आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता होती. कृपलानी यांनी मृतांच्या अंत्यविधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तत्कालीन काँग्रेस सरकारच्या ‘व्हीआयपी संस्कृती’वर टीका केली होती. केवळ विधी पाळल्याने लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळणार नाही, असं ते म्हणाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा