लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या जात आहेत. अशाप्रकारे मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातल्याची टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली.

Indian Airlines Bomb Threat
Indian Airlines : तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणाले, “विघ्नकारी कृत्यांमुळे चिंता”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
New Lady of Justice Statue Freepik all indian radio
New Lady of Justice Statue : भारतात आता ‘अंधा कानून’ नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली; तलवारीऐवजी… नव्या मूर्तीत काय आहे खास?
Loksatta chavdi Mahayuti Mahavikas Aghadi politics in assembly elections
चावडी: अशाही कुरघोड्या
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
Chakan youth Suicide in Lonavala
Chakan Suicide : प्रेमप्रकरणातून चाकणमधील तरुणाची आत्महत्या; दोन सेकंदांचा व्हिडीओ अन् बचाव पथकाने ३७० फूट खोल दरीत मृतदेह शोधला
The first list of Congress candidates will be announced on October 20 print politics news
काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला; छाननी समितीत ८४ जागांवरील उमेदवारांवर चर्चा

मुंबईतील जमिनींतून ५० हजार कोटी रुपयांचा फायदा अदानींना होणार आहे. या जमिनींवर अदानी सात लाख चौरस फूट बांधकाम करणार असून, त्यातून एक लाख कोटी रुपये कमवतील, असा आरोप करत ‘हे लोक आता अरबी समुद्राचे नावही अदानी समुद्र करतील’, अशी टीकाही आदित्य यांनी केली.

हेही वाचा >>>मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळविण्यासाठी भाजपची रणनीति, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साधणार संवाद

सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांजवळ असलेल्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली. परंतु याच निर्णयाच्या आडोशातून सरकारने भयानक गोष्टी केल्या आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सरकारने निर्णय घेताना जरी सामान्य माणसाला ५० रुपयांचा फायदा करून दिला असला तरी अदानी समूहाला ५० हजार कोटी रुपयांचा फायदा दिला आहे, असेही आदित्या यांनी सांगितले.

ही लूट कशासाठी?

देवनार जमिनीवरून राज्य सरकार आणि महापालिकेमध्ये वाद आहे. हा वाद न्यायालयातही गेला होता. एवढी जमीन धारावीची घेतल्यानंतर प्रत्येक धारावीकरांना घर मिळणार आहे का, तर तसेही नाही. कारण जर तुम्ही कंत्राटाची कागदपत्रे पाहिली तर त्यातील अपात्र होणाऱ्या कुटुंबांची संख्या दीड लाख इतकी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुलुंडच्या एका आमदाराने वचन दिले होते की अदानींना दिलेली जमीन आम्ही रद्द करू. रद्द केली का? हे भूखंड रद्द केलेच नाही उलट आणखी भूखंड त्यांना दिले गेले. ही लूट का सुरू आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.