लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात काही राज्यात चांगले रस्ते बनविले गेले आहेत, असे ऐकतो पण महाराष्ट्रातील एकही राष्ट्रीय महामार्ग चांगला नाही. मुंबई गोवा मार्गाची चाळण झाली आहे. गणेशोत्सवात कोकणी माणूस या मार्गावरून प्रवास करणार कसा? मुंबई- नाशिक, मुंबई- अहमदाबाद या महामार्गांवर खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील एकही राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त नाही. केंद्र सरकारला इतका महाराष्ट्र द्वेष कशासाठी, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

Mumbai-Bound exit at Panvel On Mumbai-Pune Expressway to close For 6 months
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; ६ महिन्यांसाठी ‘हा’ एक्झिट मार्ग राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
road lines of Shilpata road blocked
शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांचा ३०७ कोटीचा मोबदला रखडवला
Kalyan-Shilphata Road, Kalyan-Shilphata Road Traffic, Kalyan-Shilphata Road Road Closure, Kalyan-Shilphata Road Traffic diversion
Shilphata Traffic : शिळफाटा रस्त्यावर ३० मिनिटांच्या प्रवासाला २ तास, पर्यायी रस्ते उपलब्ध करूनही प्रवाशांची शिळफाट्याला पसंती, पर्यायी रस्ते कोंडीत
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?
Tilari Ghat closed for all vehicles for repair of damaged protective embankment
खचलेल्या संरक्षण कठडा दुरुस्ती करिता तिलारी घाट सर्व वाहनासाठी बंद
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल

मुंबई आणि राज्यातील रस्ते या विषयावर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतील रस्त्यांसाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली होती. त्यांना सध्या कोट्यवधी रुपयांची अग्रिम रक्कम दिली जात आहे. काही कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला होता, पण तो वसूल केला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईतील रस्त्यांसाठी देण्यात आलेल्या निविदांमधील किती कामे पूर्ण झाली आहेत याचा लेखाजोखा मुंबईकरांना पालिकेने द्यावा. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहेत. पालिकेकडे कंत्राटदारांना देण्यासाठी निधी आहे पण कामगार व ‘बेस्ट’साठी निधी नाही. राज्य सरकारची ‘लाडका कंत्राटदार’ नावाची नवीन योजना सुुरू आहे, अशी कोपरखळी ठाकरे यांनी लगावली.

Story img Loader