केंद्रातील मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह, कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केलाय. पंतप्रधान मोदींनी मंडल, मंदिर, बाजार अन् मंडई या चार ‘म’अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुद्द्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न केलाय. मोदी सरकारने सन्मानित केलेले तीन नेते हे विरोधी पक्षातील आहेत. ते म्हणजे भारतीय लोक दल (आता राष्ट्रीय लोक दल किंवा आरएलडी) नेते चरण सिंह, समाजवादी विचारसरणीचे कर्पूरी ठाकूर आणि काँग्रेसचे पहिले बिगर गांधी कुटुंबातून पंतप्रधान झालेले नरसिंह राव आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पक्षाबाहेरील जुन्या मोठ्या नेत्यांनाही महत्त्व प्राप्त करून देत आहे. तसेच त्यांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करीत आहे. मग ते सरदार वल्लभभाई पटेल असो की नेताजी सुभाषचंद्र बोस ही व्यक्तिमत्त्वे सध्या भाजपाच्या केंद्रस्थानी आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा