सर्वोच्च न्यायालयाने नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी, अयोध्या प्रकरणी राम मंदिराच्या बाजुने निकाल दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्गार काढले होते, “एखाद्याच्या मनात कसलीही कडवट भावना असेल तर ती विसरण्याचा हा दिवस आहे.” त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, आता वाराणसीतील ग्यानव्यापी मशिद आणि मथुरेतील ईदगाह हे मुद्दे संघ लावून धरणार आहे का? त्यावेळी भागवत म्हणाले होते, “ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता संघ एक संस्था म्हणून अयोध्या चळवळीशी संलग्न होता. हा एक अपवाद म्हणता येईल. आता आम्ही पुन्हा मानवी विकासाला प्राधान्य देऊ आणि या चळवळी आमच्यासाठी चिंतेचा भाग नसतील.” सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिउत्साही प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश भाजपा व आरएसएस या दोघांनीही देशभरातील कार्यकर्त्यांना दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा