कर्नाटकमधील विजयामुळे काँग्रेस पक्षाला एक नवी संजीवनी मिळाली आहे. २०२४ च्या लोकसभांची तयारी करण्यासाठी काँग्रेसला या विजयाचा मोठा लाभ होणार आहे. त्यातच आता इतर राज्यातही पक्षसंघटन बळकट करून त्या त्या राज्यातील पक्षाची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. कर्नाटकच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती पक्षाची सत्ता आहे. भाजपा हा तेलंगणात आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून करीत आहे. आता बीआरएसला भाजपासोबतच काँग्रेसचाही सामना करावा लागणार आहे. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांनी पक्षाच्या खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या आमदारांची एक बैठक पक्ष मुख्यालयात घेतली. या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोक्याची सूचना आमदारांना देत सांगितले की, आपापल्या मतदारसंघात गाफिल न राहता मेहनत घेऊन काम करा. कर्नाटक विजयामुळे काँग्रेसला कमी लेखून चालणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळात देशाचा विकास खुंटला, असाही आरोप केसीआर यांनी या बैठकीत केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा