केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी (दि. २२ जून) मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सहा दिवसांच्या राणी दुर्गावती गौरव यात्रेला झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात करणार आहेत. यात्रेच्या सहाव्या दिवशी म्हणजे दि. २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होईल. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे या माध्यमातून दिसते. २०१८ विधानसभा निवडणुकीत आदिवासी जमातीसाठी राखीव असलेल्या अनेक जागांवर भाजपाला काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मागच्या निकालातून धडा घेत भाजपाने आदिवासी जमातीची मते मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी दोन रेल्वे स्थानके आणि विद्यापीठांना आदिवासी महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. तसेच स्मारक आणि वस्तुसंग्रहालय उभारून भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात आदिवासी नेत्यांचा सहभाग ठळकपणे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा