आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा करीत बैठकांचा सपाटा लावला आहे. महायुतीचे जागावाटप, भाजपाची कामगिरी, तीन पक्षांतील समन्वय, नेतृत्वावरील नाराजी व मुख्यमंत्रिपदाचा दावेदार अशा अनेक प्रश्नांवर या बैठकांत चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) नागपूरपासून बैठकांना सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक व कोल्हापूर येथे बैठका पार पडल्या. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपा नेत्यांची मराठा आंदोलनाबाबत असलेली चिंता दूर केली. त्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार समाजाच्या आंदोलनाचे उदाहरण दिले आणि या विषयात केंद्र लक्ष घालेल, असे सांगून पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला. या बैठकांमागील राजकारणाचा दी इंडियन एक्स्प्रेसच्या लेखात उहापोह करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा