अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार १९९८ ते २००४ सालापर्यंत सत्तेत होते. त्यानंतर २०१४ व २०१९ ला पुन्हा एकदा एनडीएने दमदार कामगिरी करीत सत्ता मिळवली असली तरी ते एनडीएचे सरकार नव्हते. ते एकट्या भाजपाचे स्वबळावर स्थापन केलेले सरकार होते आणि त्यामध्ये घटक पक्षांचाही सहभाग होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती मात्र वेगळी ठरली आहे. आता भाजपाला स्वबळावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणे जमलेले नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांच्या आधारावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. खऱ्या अर्थाने आता एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सध्याचे एनडीए सरकार या दोन्हींमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आहे. त्यातीलच एक मूलभूत फरक म्हणजे ‘किमान समान कार्यक्रमा’वर अद्याप चर्चा झालेली नाही. तसेच एनडीए समन्वयकाच्या नियुक्तीबाबतही काहीही हालचाल घडताना दिसत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा