भाजपातेर पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक आजपासून (३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर) मुंबई येथे होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे प्रतिनिधी आलोक देशपांडे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पटोले यांनी, बैठकीची पूर्वतयारी, राज्यातील महाविकास आघाडीचे भविष्य व इंडिया आघाडीत फूट पाडण्याच्या प्रयत्नांबाबत भाष्य केले. या मुलाखतीचा भाग प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात खालीलप्रमाणे …

पक्षाच्या मुख्यालयात राहुल गांधी यांचा सत्कार करण्याचे नियोजन तुम्ही केले आहे?

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Chandrashekhar bawankule criticises Maha vikas Aghadi, Nagpur, Bharatiya Janata Yuva Morcha, Maha vikas Aghadi, Shivaji Maharaj, Chandrashekhar Bawankule,, protest, Uddhav Thackeray, Sharad Pawar,
महाविकास आघाडी महाराष्ट्राला कलंकित करीत आहे, बावनकुळेंची टीका
Ajit Pawar, Maratha reservation, Marathwada, NCP, Lok Sabha elections, Muslim community, Ramgiri Maharaj, protest, Vasmat, Ahmedpur, ncp
अजित पवार यांना मराठवाड्यात विरोध; मराठा, मुस्लीम समाजांच्या नाराजीचा फटका
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला भेट देणाऱ्या योद्ध्याचा सत्कार आम्हाला करायचा आहे. जे हुकूमशाही वृत्तीचे लोक देशाचे संविधान बदलण्याचा आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्याविरोधात लढण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या लढाईमुळे त्यांची खासदारकी मध्यंतरी रद्द करण्यात आली होती, तसेच त्यांना शासकीय निवासस्थानातूनही बाहेर काढण्यात आले.

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली, तेव्हा लोकसभा सभागृहात त्यांनी मणिपूरमधील आमच्या भगिनींबद्दल आवाज उचलला. जेव्हा असा योद्धा मुंबईत येऊन पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार आहे, अशा वेळी त्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या राहुल गांधींमुळे महाराष्ट्र काँग्रेसला लाभ होईल?

राहुल गांधी यांच्या या भेटीचा फायदा घेऊन आम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अर्ध्याहून अधिक जनतेला पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा संकटकाळात राज्यातील आणि केंद्रातील सरकार राजकारण खेळण्यात व्यग्र आहे. गॅस सिलिंडरचे दर ७०० रुपयांनी वाढवून, मग त्यात २०० रुपयांची कपात करणे ही शुद्ध फसवणूक आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने हे प्रश्न उपस्थित करणार आहोत.

‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय का?

हो, असा प्रयत्न नक्कीच होत आहे. बंगळुरू येथे इंडिया आघाडीची बैठक होत असताना एनडीए (National Democratic Alliance) युतीने ३८ पक्षांची बैठक घेतली. आमच्याकडे जास्तीत जास्त राज्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि ही संख्या वाढत चालली आहे. साहजिकच इंडिया आघाडीची एनडीला भीती वाटत आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जागावाटपावरून गोंधळ आहे. अशा पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकेल?

महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा नेते) यांनी सांगितले आहे की, ज्या पक्षाची जिथे जास्त ताकद आहे, त्याप्रमाणे जागावाटप होईल. नरेंद्र मोदी सरकारला पराभूत करणे, हेच आमच्या आघाडीचे प्रमुख ध्येय आहे.

‘भारत राष्ट्र समिती’सारखा पक्ष भाजपाच्या इशाऱ्यावर काम करतोय, असे तुम्हाला वाटते का?

जरी त्यांनी असा प्रयत्न केला तरी त्याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. बीआरएसला त्यांच्याच राज्यात संघर्ष करावा लागत आहे आणि महाराष्ट्रातील जनता बाहेरच्या राज्यातील पक्षाला इथे तग धरू देणार नाही.

वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आघाडीत येणार का?

सध्या तरी त्यांच्या बाजूने आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही याबाबत त्यांच्याशी चर्चा केलेली नाही.