छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कोंडीत सापडलेल्या भाजपला मराठवाड्यात पुन्हा एकदा पाण्याच्या आंदोलनातून एकाकी पाडण्यात अन्य पक्षीय नेत्यांना यश आले, असे चित्र निर्माण झाले. सोमवारी भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातही गोदाकाठच्या कार्यकर्त्यांचा समावेश अधिक होता. या आंदोलनात राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, माजी मंत्री अनिल पटेल यांचा प्रमुख सहभाग होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे खास अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारे आमदार संजय शिरसाटही आंदोलनात सहभागी झाले.

जायकवाडी जलाशयात ८.६ अब्ज घनफुट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यावर दबाव आणला असल्याची चर्चा मराठवाड्यात सुरू आहे. त्यामुळे सोमवारच्या आंदोलनात राधाकृष्ण विखेंच्या विरोधात घोषणाबाजी झाली.

Ajit Pawar, Maratha reservation, Marathwada, NCP, Lok Sabha elections, Muslim community, Ramgiri Maharaj, protest, Vasmat, Ahmedpur, ncp
अजित पवार यांना मराठवाड्यात विरोध; मराठा, मुस्लीम समाजांच्या नाराजीचा फटका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Raj Thackeray, gadchiroli, Maha vikas Aghadi,
“लोकसभेत महाविकास आघाडीला कौल, कारण…” काय म्हणाले राज ठाकरे?
Ravikant Tupkar, Eknath Shinde,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..
Raj Thackeray, Raj Thackeray Banner,
महाराष्ट्रात आणखी एक भावी मुख्यमंत्री….
eknath shinde reaction on manoj jarange
Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप खोटे, मराठा आरक्षणासाठी त्यांनी…”; मनोज जरांगेंच्या ‘त्या’ आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Ajit Pawar
Ladki Bahin Yojana : रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या…”

हेही वाचा : भाजपाकडून फार महत्त्व नाही; पण वसंधुरा राजे त्यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही ‘राणी’

परभणी जिल्ह्यात भाकपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन आधीच छेडले होते. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनीही सरकारला घरचा आहेर दिला. नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा पाणी परिषद हे औपचारिक संघटन उभे करून पाण्याच्या लढ्याला न्यायालयीन बळ देण्यात आले. या कार्यकर्त्यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळासमोरही आंदोलन केले. सोमवारी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात आली. जालन्यातून राजेश टोपे आणि शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हेही आंदोलनात उतरले. काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी मराठवाड्याच्या न्याय प्रश्नासाठी सर्वपक्षीय एकजुट होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी आवर्जून व्यक्त करण्यात आले. मात्र, या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा अजिबात सहभाग नव्हता.

हेही वाचा : कसबा पेठेतील वातावरण पुन्हा तापले

आंदोलनादरम्यान आमदार हरिभाऊ बागडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. ‘माझे आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे झाले आहे. त्यांनी जायकवाडीत पाणी सोडू, असे सांगितले आहे. आम्ही आंदोलनात सहभागी नाही आहोत. मात्र, पाणी सोडले जाईल असा निरोप देण्यासाठी आंदोलनस्थळी आलो.’ पाणी कधी सोडले जाईल, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण व्हावी अशी रचना जमून आली होती. त्याचा अन्य भाजप वगळता अन्य पक्षातील नेत्यांनी माध्यमांमध्ये लाभ उठवण्याचाही प्रयत्न केला. आता पाण्यावरूनही भाजप आणि जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस यांच्याविषयीचा रोष वाढता राहील, असे प्रयत्न दिसून आले. विशेष म्हणजे या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची आंदोलनात लक्षणीय संख्या होती. महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. उद्धव ठाकरे गटाने आंदोलनात फारसा उत्साह दाखविला नाही. पण माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी हजेरी लावली.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक भाजपामध्ये खदखद; विजयेंद्र यांच्या नियुक्तीमुळे अनेक नेते नाराज!

राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या नगर जिल्ह्यातील दोन नेत्यांमुळे पाणी अडविले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला खरा. पण प्रामुख्याने मंत्री विखे यांनी यात पुढाकार घेतल्याने त्यांच्या विरोधात मराठवाड्यात रोष दिसून येत आहे. अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीवाच्या विवाहप्रसंगी हजेरी लावणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जायकवाडीच्या पाणी वाटपावर उद्या बोलू, असे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे समर्थक आंदोलनात सहभागी झाले, हे विशेष.