पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा तापल्यानेच बहुधा भाजपलाही जातनिहाय जनणगनेवर सावध भूमिका घ्यावी लागली आहे. भाजपचा जातनिहाय जनगणनेला कधीच विरोध नव्हता, असे स्पष्ट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसी समाज या मुद्द्यावर भाजपपासून दूर जाणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.

जातनिहाय जनगणनेचे भाजपने कधीच समर्थन केले नव्हते. याउलट भाजप नेत्यांची भूमिका या विरोधातच होती. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने विरोधी भूमिका मांडली होती. तसे प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. बिहारमधील जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीच्या आधारावर देशात फूट पाडण्याचा प्रयोग होत असल्याचा आरोप केला होता. मोदी किंवा भाजपच्या अन्य नेत्यांची विधाने ही बिहारमधील जातनिहाय जनगणनेच्या विरोधातच होती. बिहारमधील जातनिहाय जनगणनेच्या व्यवहार्यतेबद्दल भाजपने शंकाही उपस्थित केली होती.

cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
Haryana Assembly Election
Haryana Assembly Election : भाजपाचं हरियाणात धक्कातंत्र; दोन मंत्र्यांसह सात आमदारांचा पत्ता कट, तिकीट न मिळालेल्यांमध्ये नाराजी?
nashik potholes protest marathi news
नाशिकमध्ये खड्ड्यांप्रश्नी आंदोलनांमध्येही राजकारण
BJP, Murlidhar Mohol, Pune, assembly elections, Kasba constituency, bjp lok sabha set back, party strategy, Parvati Assembly constituency, Pune Cantonment Assembly constituency,
मुरलीधर मोहोळांचे पक्षातील वजन वाढले, विधानसभेसाठी दिली मोठी जबाबदारी
Chandrapur, Congress, Ayarams, loyalists, assembly elections, Maha vikas Aghadi, candidature, party tensions, Maharashtra assembly election 2024,
आयारामांमुळे काँग्रेस निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ

हेही वाचा – ‘संपूर्ण देश अयोध्यामय करणार’, रा. स्व. संघाकडून राम मंदिर उद्घाटनाचे नियोजन

बिहारमधील जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यापासून काँग्रेसने देशभर जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसने जाहीरनाम्यातच जातनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले आहे. सध्या प्रचारात काँग्रेसने जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर भर दिला आहे. इंडिया आघाडीच्या अन्य घटक पक्षांकडूनही जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध असल्याचे चित्र यातून उभे राहिले होते.

हेही वाचा – मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांचा विषय पेटणार

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदीबहुल राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेच्या मागणीचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्यानेच भाजपचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडमधील प्रचारात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. जातनिहाय जनगणनेला भाजपने कधीच विरोध दर्शविला नव्हता. फक्त सर्व घटकांशी चर्चा करून योग्य वेळी जातनिहाय जनगणना केली जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केले. अमित शहा यांच्या या भूमिकेवरून भाजपनेही जातनिहाय जनगणनेवर सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये ओबीसी आणि अन्य मागासवर्गीय समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. यामुळेच मोदी यांनी जातनिहाय जनगणनेवर आधी टीका केली असली तरी शहा यांनी मध्यमार्ग स्वीकारला आहे.