लोकसभा निवडणुकीच अयोध्येमध्ये राममंदिर बांधण्याची स्वप्नपूर्ती झाल्याबद्दल भाजपने देशभर रामाच्या नावाने मते मागितली होती. पण राममंदिराचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला नाही. यामुळेच बहुधा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला रामाचा विसर पडला असावा. भाजपची फौजच प्रचारात उतरली असली तरी एकाही नेत्याने आतापर्यंत राम किंवा राममंदिराचे नावही घेतलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राममंदिराचा मुद्दा होता. पण ज्या आयोध्येवरून देशाचे राजकारण तापले तेथे भाजपचा पराभव व्हावा आणि समाजवादी पक्ष जिंकावा हे विचार करण्याजोगे आहे. अयोध्येतील समाजवादी पक्षाच्या विजयामागे स्थानिकांचा भाजपवरील रोष कारणीभूत होता. वाराणसीतून जिंकलेल्या पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्य शिरुरमधून जिंकलेल्या आमच्या अमोल कोल्हे यांच्यापेक्षा कमी आहे. आपण मतदारांना कमी लेखतो. त्यांना गृहित धरतो. वातावरण, समाजमाध्यांमातील चर्चेत वाहून जातो. त्यामुळे स्थनिक परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे याकडे आपले लक्ष नसते हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा