पीटीआय, किश्तवार
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये स्पष्ट लढत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते म्हणाले की एका बाजूने कलम ३७० परत आणायचे आहे, तर दुसरी बाजू ते थांबवण्यासाठी ठाम आहे. भाजपचे उमेदवार शुगन परिहार यांच्या बाजूने मतदान करणे केवळ विकास आणि प्रगतीसाठीच नव्हे तर त्यांच्या वडिलांसह इतर शहीदांना श्रद्धांजली वाहणे आहे. जम्मू आणि काश्मीरमधील ही निवडणूक स्पष्टपणे दोन शक्तींमधील आहे, असे शाह यांनी येथे एका सभेत सांगितले.

हेही वाचा : Haryana Election : हरियाणाच्या निवडणुकीत राजकीय घराण्यातील उमेदवारांची संपत्ती जाहीर; कोण आहेत सर्वात श्रीमंत दुष्यंत चौटाला?

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
sangli islampur
चावडी: इस्लामपूरची ताकद कुणाच्या पाठीशी…
Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency Vidhan Sabha Nivadnuk 2024
कारण राजकारण: केसरकरांसमोर ठाकरे गटाबरोबर भाजपचेही आव्हान, लोकसभेत मताधिक्यात वाढ
Ashok Chavan Bhaskarrao Khatgaonkar Patil
Ashok Chavan : “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशोक चव्हाणांचा ‘या’ नेत्याला इशारा
Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
BJP leaders Kuldeep and Bhavya Bishnoi with a group of villagers in their constituency Adampur on Monday. (Express Photo
BJP leaders : हरियाणात भाजपा नेत्यांविरोधात निदर्शनं; शेतकऱ्यांचा रोष भाजपाला भोवणार?

भाजप आणि गांधी-अब्दुल्ला घराण्यांमध्ये ही लढत आहे. दोघांचा अजेंडा स्पष्ट आहे. ‘एक कायदा, एक ध्वज आणि एक पंतप्रधान’ या तत्त्वाचा आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, या प्रेमनाथ डोगरा यांच्या विचारसरणीचे अनुसरण भाजप करते. पक्षाचे उमेदवार शुगन परिहार, सुनील शर्मा आणि तारक कीन यांच्या समर्थनार्थ शहा प्रचार करत होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने जेव्हाही सरकार स्थापन केले, तेव्हापासून दहशतवाद फोफावला आहे, असा आरोप त्यांनी केला.