पुडुचेरीमधील सत्ताधारी ऑल इंडिया एनआर काँग्रेस (AINRC) नेतृत्वातील सरकारमध्ये धुसफूस सुरु आहे. या पक्षाबरोबर भाजपादेखील सत्तेत आहे. या धुसफूसीमुळे पुडुचेरीतील सात आमदारांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी हे सात आमदार बुधवारी (३ जुलै) दिल्लीला रवाना झाले. या सात आमदारांमध्ये भाजपाचे तीन, भाजपाचाच नामनिर्देशित एक आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे. पुडुचेरीमधील ही अस्थिर परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची समस्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळामध्ये बदल घडवून आणण्याची मागणी केली जात आहे. या सगळ्या घडामोडींमागील महत्त्वाचे आणि प्रभावी कारण दुसरेच मानले जात आहे. पुडुचेरीचे गृहमंत्री ए. नामसिवायम यांना गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार व्ही. वैथिलिंगम यांनी त्यांचा १.३६ लाख मतांनी पराभव केला. नामसिवायम हे मुख्यमंत्री आणि AINRC पक्षाचे नेते एन. रंगासामी यांचे पुतणे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा