मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मुंबईत मात्र ही जबाबदारी आणि अधिकार मुंबई महापालिका आयुक्तांवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई महापालिका आयुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी चर्चा

41 aspirants in eight constituencies of pune NCP Sharadchandra Pawar party preparing for assembly
शहरातील आठ मतदारसंघांत ४१ इच्छुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची तयारी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : लोकसभेला महायुतीच्या काय चुका झाल्या? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “आम्हाला अंदाजच नव्हता…”
AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ?
Vishal Patil, Sangli, MP Vishal Patil,
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा नेमका पाठिंबा कोणाला ?
BJP rashtriya seva Sangh Co ordinator Constituency Upcoming Assembly Election
निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक
Jagdish Muliks hopes increased after Pankaja Munde is given responsibility of three constituencies in Pune
मुंडेंकडे जबाबदारी अन् मुळीकांच्या आशा पल्लवीत! वडगावशेरीमध्ये महायुतीत चुरस
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ

आगामी विधानसभा निवडणूक ही मुंबई महापालिका आयुक्तांना पार पाडावी लागणार आहे. देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते. मात्र, चेन्नई आणि बेंगळूरु या शहरामध्ये सर्व कारभार महापालिकांच्या अखत्यारित येत असल्याने तेथे निवडणुकांची जबाबदारी आणि अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आले आहेत. या दोन्ही शहरात उपक्रम यशस्वी ठरलेला हा उपक्रम आता मुंबईतही राबविण्यात येणार आहे. मुंबईत शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आले असून आजवर तेच निवडणुका घेत होते. मात्र, मुंबईत सर्व यंत्रणा पालिकेकडे असल्याने निवडणुका घेताना जिल्हाधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांकडे देण्यात आली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे.