केरळच्या तिरुवनंतपुरममधील खासदार आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते शशी थरूर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर काही काळ थरूर यांनी केरळचा दौरा केला. यामध्ये त्यांनी केरळच्या राजकारणात परतण्याचे संकेत दिले आहेत. एवढंच नाही तर विविध धर्मगुरु, सामाजिक घटक आणि त्यांच्या संघटना यांच्या भेटीगाठी, संवाद साधण्याचे कार्यक्रम त्यांनी सुरु केले आहेत. त्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये चुळबूळ वाढली असून काहींनी थेट तर काहींनी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत थरूर यांना दबक्या आवाजात विरोध करायला सुरुवात केली आहे.

केरळमधील राजकीय परिस्थिती

केरळमध्ये अनेक वर्षांपासून मार्क्सवादी आणि मार्क्सवादाच्या विरोधी पक्षांचा पगडा राहिला आहे. सध्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचे पिनाराई विजयन यांनी पारंपरिक मार्क्सवादी मतांचे विभाजन करुन सत्ता काबीज केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मागच्या काही दशकात येथे बूथ स्तरावर जाऊन संघटनात्मक काम केल्यामुळे त्यांची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा पाया कमजोर झालेला आहे.

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Parvesh Verma celebrating victory over Arvind Kejriwal, despite Amit Shah's advice to contest from another party.
Who Defeated Arvind Kejriwal : अमित शाह यांनी दिला होता दुसरीकडून लढण्याचा सल्ला, पण प्रवेश वर्मांनी केजरीवालांना पराभूत करून दाखवलं
politics appointment of district head uddhav Thackeray Shiv sena group Kolhapur
कोल्हापुरात ठाकरे गटात जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून कुरघोडीचे राजकारण
Mallikarjun Kharge reacts angrily to Neeraj Shekhar’s interruption in the Rajya Sabha with the comment "Tera baap mere saath tha!"
Mallikarjun Kharge : “गप्प खाली बस, मी तुझ्या बापाचाही…”, राज्यसभेत माजी पंतप्रधानांच्या मुलावर मल्लिकार्जुन खरगे संतापले
तेलंगणातील पराभवानंतर के. चंद्रशेखर राव कुठे आहेत? बीआरएसचे नेतृत्व कुणाकडे? (फोटो सौजन्य पीटीआय)
Telangana Politics : तेलंगणातील राजकारणात केसीआर ‘पुन्हा परत येणार’; एवढा काळ ते होते कुठे?
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका

काँग्रेसचे माजी नेते के. करुणाकरन यांनी पक्ष सोडल्यामुळे २००० साली काँग्रेसला मोठा झटका मिळाला. करुणाकरन यांच्या जाण्याने काँग्रेसकडील हिंदू मतांचा आकडा चांगलाच रोडावला. करुणाकरण आणि ए. के. अँटनी हे काँग्रेसमधील दोन मोठे नेते होते. पण या दोन नेत्यांमधील गटबाजीमुळे काँग्रेसला कधी पराभव तर दोन गट एकत्र आल्यानंतर विजय प्राप्त होत होता.

२०१६ मध्ये काँग्रेसचे आणखी एक नेते ओमन चांडी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविल्यामुळे काँग्रेस संघटनेची स्थिती आणखी हलाखीची बनली. २०२१ मध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस जिंकू शकली असती, तिथे केवळ संघटनेचा ढाँचा नसल्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. आता परिस्थिती अशी आहे की, २०२६ मध्ये पुन्हा एकदा एलडीएफ प्रणीत पिनराई यांचे सरकार येऊ शकते.

तर शशी थरूर यांची राजकीय कारकिर्द संपेल

शशी थरूर हे केरळमध्ये सक्रीय झाल्यामुळे प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांना त्यांचा धोका वाटत आहे. केरळमध्ये प्रभावशाली असलेल्या नायर समुदायाची संघटना नायर सर्विस सोसायटी (NSS) ने देखील शशी थरूर यांच्या केरळमधील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र एनएसएसच्या कौतुकानंतर शशी थरूर यांच्यावर डाव्या पक्षातील नेते आणि वंचित संघटनांनी टीका केली आहे. एनएसएसने पाठिंबा दिल्यामुळे शशी थरूर यांची राजकीय कारकिर्द जवळपास संपुष्टात येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जातो. नायर समुदाय स्वतःला शासनकर्ती जमात म्हणून संबोधित करत आलेला आहे. या त्यांच्या भूमिकेला अनेकांचा विरोध आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर अजूनही प्रतिक्रिया का दिली नाही? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

Story img Loader