मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात व मुंबईत भाजपने दणदणीत विजय मिळविल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणि अॅड. आशिष शेलार यांना मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार, याविषयी भाजपमध्ये विविध नावांवर चर्चा सुरू आहे. पण मंत्रिमंडळात भाजपच्या जास्तीत जास्त १२-१३ नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता असून काही जागा रिक्त ठेवल्या जातील. त्यामुळे मंत्रिमंडळात जातीय समीकरण आणि विभागनिहाय प्रतिनिधित्व देताना मोजक्याच नेत्यांना संधी मिळणार असून, इच्छुक नेत्यांना वरिष्ठांकडून पुन्हा पक्षासाठी त्याग करण्याचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे.

Pune Man Expressed Unique Agitation About The Bad Roads In Pune Video goes Viral on social media
पुणेकर काकांचा नाद नाय! खराब रस्त्यांना कंटाळून महानगरपालिकेच्या गेटवर केलं पुणेरी स्टाईल आंदोलन; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MNS workers beat up bullet drivers who made noise in Nigadi pune news
MNS News: पुण्यात मनसेचा बुलेट चालकाला चोप, कर्णकर्कश्य आवाजाच्या सायलेन्सर त्रासाविरोधात धडक कारवाई
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?

हेही वाचा >>>Ajit Pawar : एकनाथ शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ अजित पवारांनी कशी संपवली? शरद पवारांच्या पावलावर पाऊल कसं ठेवलं?

बावनकुळे व शेलार यांच्या अध्यक्षपदाची मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत असल्याने सध्या तरी त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका आणि बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. भाजपच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठे यश मिळविणे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षपदी नवीन नेत्याची नियुक्ती शक्यतो करू नये, असा पक्षाचा विचार आहे.

भाजपला जातीय समीकरणाचाही विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे असतील, तर प्रदेशाध्यक्षपद बावनकुळे या ओबीसी आणि मुंबई अध्यक्षपद शेलार या मराठा समाजातील नेत्याकडे असल्यास जातीय समीकरणही साधले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader