ठाणे लोकसभेचा महत्वाचा भाग असलेल्या मीरा-भाईंदर शहरांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सत्ताबदलानंतर लक्ष केंद्रीत केल्याने या भागातील भाजप नेते कमालीचे सावध झाले आहेत. जैन, गुजराती समाजाचा मोठा भरणा असलेली ही शहरे अलिकडच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनली आहेत. राज्यात युतीचे सरकार असताना येथील महापालिका निवडणुकीत भाजप आणि पुर्वीची एकसंघ शिवसेना एकमेकांविरोधात लढले. शिवसेनेचे या भागातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ही शहरे जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र ऐनवेळेस येथील ठराविक समाजातील साधूंनी केलेल्या आवाहनाचा मोठा फटका शिवसेनेला बसला. तेव्हापासून या शहरांवर एकहाती वरचष्मा मिळविण्यासाठी आमदार सरनाईक प्रयत्नशील आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही या शहरांवर लक्ष केंद्रीत केले असून विद्यमान आमदार गीता जैन आणि सरनाईक या दोघांनाही भरभरुन निधी दिला जात आहे. या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून मीरा-भाईंदरवर आपल्या पक्षाची पकड कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची रणनिती भाजपच्या स्थानिक नेत्यांना मात्र अस्वस्थ करु लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा