अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या सद्यास्थितीचा तसेच खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. मात्र, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा झाकोळला गेला. रायगड जिल्ह्यातील रस्त्याची पाहणी करूनच या दौऱ्याची सांगता करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरले होते. पळस्पे पासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरवात केली, गडब, वाकण, कोलाड, माणगाव येथे त्यांनी भर पावसात उतरून रस्त्याच्या कामांची पाहणी केली. यानंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सांगता करण्यात आली.

Pandharpur Mangalwedha Assembly Constituency in Vidhan Sabha Election 2024
कारण राजकारण: पंढरपूर मंगळवेढ्याचे निवडणूक रिंगण खुले
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Maharashtra State Waqf Board marathi news,
‘राज्य वक्फ बोर्डा’ने सुधारणा विधेयकाला विरोध करावा!
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Raigad, Mumbai-Goa highway,
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड

हेही वाचा : ‘राज्य वक्फ बोर्डा’ने सुधारणा विधेयकाला विरोध करावा!

मुख्यमंत्र्याची पाहणी दौरा सुरू असतानाच मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नौदला मार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांचा पुतळा कोसळल्याची बातमी आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. माध्यमांचा सर्व फोकस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांकडून पुतळा दुर्घटनेकडे वळला गेला.