छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले पंकजा व धनंजय मुंडे या चुलत भावंडांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या कौटुंबिक नात्यातील आणि पक्षीय पातळीवरील वैचारिक मतभेद मिटवून मनोमीलन झाल्याचे संकेत अनेकवेळा दिलेले असले तरी अजूनही परस्परांविषयी अढीच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या काही विधानांवरून भावंडांमधील राजकीय दरी पूर्णपणे मिटली नसल्याचेही अर्थ काढले जात आहेत. महासांगवी येथील धार्मिक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी, राजकारणात काम करणाऱ्यांनी धर्मात हस्तक्षेप करू नये, असे विधान केले होते. एका भेटीतून एखादा गड आणि तेथील लाेकं आपली होत असतील, असे कोणाला वाटत असेलही पण आपल्याला तसे वाटत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा