नवी दिल्ली : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात मतदार यादीतून मोठ्या संख्येने नाव वगळल्याचा काँग्रेसचा दावा आहे. पक्षाने जे आरोप केले आहेत, त्याच्या पडताळणीसाठी आयोगाने तपशील पुरवावा अशी मागणी पक्षाने केली.

हेही वाचा >>> हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना दिल्लीकरांनी का नाकारलं? ‘आप’वर मतदार असमाधानी का होते? सर्वेक्षणातून समोर आली कारणं
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Arvind Kejriwal rise in Indian politics
केजरीवाल यांचा भारतीय राजकारणात उदय कसा झाला? पहिल्या मोठ्या पराभवानंतर केजरीवाल राजकारणात कसे टिकणार?
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका

काँग्रेसच्या शिष्टमंडळात अभिषेक मनु सिंघवी, मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रामुख्याने समावेश होता. निवडणुकीतील पक्षपातीपणाने लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे सिंघवी यांनी नमूद केले. लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यांत मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून नावे वगळण्यात आली. त्याचा तपशील मागितल्याचे सिंघवी यांनी स्पष्ट केले. या कालावधीत ४७ लाख मते कशी वाढली असा प्रश्नही विचारला. आयोगाने आम्हाला ३६ लाख हा आकडा सांगितला. मात्र तोही कमी नाही असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सर्व आक्षेपांना उत्तर देऊ असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतदानात ७६ लाखांनी वाढ

आयोगाने मतदानादिवशी पाच वाजता ५८ टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मात्र साडे अकरा वाजता ही टक्केवारी ६५.०२, तर दोन दिवसांनी टक्केवारी ६६.०५ जाहीर केली, म्हणजे ७६ लाख मतदान वाढले. असे सिंघवी यांनी निदर्शनास आणले.

Story img Loader