नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या’ या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी बुधवारी त्यांना ‘लक्ष विचलित करणे थांबवा आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करा, असे म्हटले आहे. मुंबईत नोकरीसाठी जमलेल्या गर्दीचा चित्रफीत प्रसिद्ध झाली आहे.

हेही वाचा >>> “स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!

Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
Ajit Pawar avoid criticizing Sharad Pawar
लोकसभेत फटका बसल्यानेच शरद पवारांवर टीकाटिप्पणी अजित पवारांनी टाळली
kolkata rape case
Mamata Banerjee : “विरोधकांकडून राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न”; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जींनी सुनावलं!
cm eknath shinde reaction uddhav thackeray convoy attack
Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी १६ जुलै रोजी मोठ्या संख्येने तरुण मुंबई विमानतळावर पोहोचले होते. तेथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केली. त्यात म्हणाल्या, ‘काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मुंबईत म्हणत होते की, आम्ही इतक्या कोटी लोकांना रोजगार देऊन विक्रम मोडला आहे. बेरोजगारांच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ समोर आला आहे. याच मुंबईत काही रिक्त पदांसाठी आलेले लोक दिसत आहेत, याआधी गुजरातमधील एका हॉटेलमध्ये २५ जागांसाठी १५ लाख बेरोजगार आले होते आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून हे दिसून येते की रेकॉर्ड नक्कीच मोडला गेला आहे, परंतु तो बेरोजगारीचा. देश ऐतिहासिक बेरोजगारीचा सामना करत आहे,’ अशी टीका त्यांनी केली.