छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही वसंत चव्हाण यांनी नांदेडचा गड राखला खरा पण आता दिल्लीत किंवा राज्यात उमेदवारी देताना आपल्याला नेता कोण या विचाराने ‘आता तुम्हीच लक्ष द्या साहेब’ अशी विनंती नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हणमंत बेटमोगरेकरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. खासदार कल्याण काळे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, ही भावना मराठवाड्यात काँग्रेसचे प्राबल्य असणाऱ्या अनेक मतदारसंघातून हाेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातून चार आमदार निवडून आले होते. मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा समावेश होता. यातील काही आमदार काँग्रेसमध्ये असले तरी ते अशोकराव चव्हाण यांच्याबरोबर जातील अशी चर्चा गेली अनेक दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जितेश अंतापूरकर यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला नसल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडेही केली आहे. अन्यही एका आमदाराचे नाव चर्चेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जरी काँग्रेसचा विजय झाला असला तरी पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीची गरज असल्याचे कार्यकर्ते आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे आता आम्हाला काेणी वाली उरला नाही, आता तुम्हीच लक्ष घाला अशी विनंती बेटमोगरेकरांनी केली आहे. दुसरीकडे संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे आता जालन्याचे खासदार झाले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी जालना मतदारसंघात २० दिवस खूप काम केल्याचे सांगत माजी आमदार नामदेव पवार यांनी मलाही निवडणूक लढावायची आहे, किमान जिल्हाध्यक्ष पद तरी मिळावे अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर पुनर्बांधणीची मागणी विविध ठिकाणांहून होत आहे. त्यामुळेच काँग्रेसनेही विविध नेत्यांचे दौरे प्रस्तावित केले आहेत.

हेही वाचा – तिरकी टोपी आणि पायघोळ धोतर…!

हेही वाचा – परभणीचे बाबाजानी दुर्राणी पुन्हा स्वगृही !

कॉग्रेसचे नेते ऑगस्टमध्ये मराठवाड्यात

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना १० ते १४ ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत. १० ऑगस्ट रोजी लातूर येथे दोन मतदारसंघांची बैठक होणार आहे. नांदेड येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तर १२ ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीमध्ये नव्या रचना केल्या जातात का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातून चार आमदार निवडून आले होते. मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा समावेश होता. यातील काही आमदार काँग्रेसमध्ये असले तरी ते अशोकराव चव्हाण यांच्याबरोबर जातील अशी चर्चा गेली अनेक दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जितेश अंतापूरकर यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला नसल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडेही केली आहे. अन्यही एका आमदाराचे नाव चर्चेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जरी काँग्रेसचा विजय झाला असला तरी पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीची गरज असल्याचे कार्यकर्ते आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे आता आम्हाला काेणी वाली उरला नाही, आता तुम्हीच लक्ष घाला अशी विनंती बेटमोगरेकरांनी केली आहे. दुसरीकडे संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे आता जालन्याचे खासदार झाले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी जालना मतदारसंघात २० दिवस खूप काम केल्याचे सांगत माजी आमदार नामदेव पवार यांनी मलाही निवडणूक लढावायची आहे, किमान जिल्हाध्यक्ष पद तरी मिळावे अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर पुनर्बांधणीची मागणी विविध ठिकाणांहून होत आहे. त्यामुळेच काँग्रेसनेही विविध नेत्यांचे दौरे प्रस्तावित केले आहेत.

हेही वाचा – तिरकी टोपी आणि पायघोळ धोतर…!

हेही वाचा – परभणीचे बाबाजानी दुर्राणी पुन्हा स्वगृही !

कॉग्रेसचे नेते ऑगस्टमध्ये मराठवाड्यात

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना १० ते १४ ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत. १० ऑगस्ट रोजी लातूर येथे दोन मतदारसंघांची बैठक होणार आहे. नांदेड येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तर १२ ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीमध्ये नव्या रचना केल्या जातात का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.