नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तराखंड राज्यामध्ये खाते उघडण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. राज्यातील पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. उत्तराखंडमध्ये आपले काय चुकते आहे, याचे विश्लेषण उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीने (UPCC) केले आहे. पक्षाच्या नेत्यांमधील समन्वय, सुसंवाद आणि ताळमेळ यांच्या अभावामुळेच राज्यातील पाचही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पक्षाने काढला आहे. उत्तराखंडमधील पक्षाच्या कामगिरीचे योग्य ते मूल्यांकन करण्याचे आदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) उत्तराखंडमधील पक्षाचे वरिष्ठ नेते पी. एल. पुनिया यांना दिले आहेत. उत्तराखंडमध्ये १० जुलै रोजी बद्रीनाथ आणि मंगलौर या विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर पुनिया पक्षाच्या कामगिरीचे मूल्यांकन करतील, अशी अपेक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा