नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हे स्पष्ट झाले. ‘तटस्थ’ सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे आणि ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही पसंती दिल्यामुळे खरगे हेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता असून निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे मानले जात आहे. खरगे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या बाजूने प्रस्तावक म्हणून काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी गर्दी केली होती. यामध्ये भुपेंद्रसिंग हुड्डा, आनंद शर्मा, मनिष तिवारी, दिग्विजय सिंह, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी काँग्रेसच्या जी-23 गटातील नेत्यांचाही समावेश होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा