भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच ‘संसद ही सर्वोच्च आहे’ असं विधान केलं. धनखड यांच्या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आक्षेप घेतला. त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या विधानाचं खंडन केलं असून ‘संविधान हेच सर्वोच्च आहे’ असं त्यांनी म्हटलं.

“राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड जर म्हणत असतील की संसद ही सर्वोच्च आहे, तर ते चुकीचे आहेत. संविधान ही सर्वोच्च आहे. बहुसंख्याकांकडून संविधानाच्या मूळ तत्त्वावरील हल्ला रोखण्यासाठी मूलभूत संरचनेची मांडणी करण्यात आली” असं चिदंबरम यांनी आपल्या ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
devendra fadnavis nitin gadkari
फडणवीसांच्या निवडीवर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याच्या विकासाला …”

हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; तब्बल २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सहभागी होण्याचे आवाहन

“समजा जर संसदेनं बहुमताच्या जोरावर देशातील संसदीय लोकशाही व्यवस्था अध्यक्षीय लोकशाहीत बदलली. किंवा परिशिष्ट ७ मधील राज्यांची यादी रद्द केली आणि राज्य विधिमंडळाचे सर्व अधिकार काढून घेतले, तर अशी घटना दुरुस्ती वैध असेल का?” असा सवालही पी चिदंबरम यांनी विचारला आहे.

देशातील विधानसभा अध्यक्षांचं ८३ वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलन राजस्थानमधील जयपूर येथे पार पडत आहे. याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला होते. या कार्यक्रमातून जगदीप धनखड यांनी संसदेच्या कामात सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा- तृणमूलच्या महुआ मोईत्रांनी बनवला चहा अन् होऊ लागली थेट मोदींशी तुलना, कॅप्शन ठरले निमित्त! नेमकं काय घडलं?

यावेळी धनखड म्हणाले, “आपण संसदेत न्यायालयाचा निकाल लिहू शकत नाही. तसेच, न्यायालय कायदे तयार करु शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्व संस्थांनी आपल्या क्षेत्राच्या मर्यादेत राहत, अन्य संस्थांमध्ये घुसखोरी करु नये. अंतिम निर्णय हा संसद घेते. त्यामुळे अन्य संस्थांमध्ये कोण असेल ते देखील संसद ठरवेल,” असं धनखड यांनी सांगितलं. यावर पी चिदंबरम यांनी आक्षेप घेतला.

Story img Loader