मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाचा मिळालेला लक्षणीय पाठिंबा पाहता या समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट करू लागला आहे. भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लीम महिलांसाठी बुरखावाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम समाज आठवू लागला का? अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> सागरी सेतूमुळे परदेशात आल्याचा भास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती
Vijay Wadettiwar critized mahayuti government
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती बिकट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘ पुढे येण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार
मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात अनोखा विक्रम

भाजपबरोबर सरकार स्थापन केल्याने महायुतीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटापासून राज्यातील मुस्लीम समाज दुरावला असल्याचे चित्र आहे. एकगठ्ठा मतपेटी असलेल्या या समाजाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुचकारण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे व अजित पवार गट करीत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा मतदारसंघातील आमदार यामिनी जाधव यांनी मंगळवारी मुस्लीम समाजातील महिलांना बुरखावाटप केले. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर टीका सुरू केली आहे. सकाळ-संध्याकाळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आता मुस्लीम समाजाची गरज वाटू लागली का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. विकासाचे मुद्दे नसल्याने मतांवर डोळा ठेवून प्रत्येक योजना तसेच कार्यक्रम राबविले जात आहेत. एकीकडे पदोपदी मुस्लीमद्वेष पसरवण्याचे काम कारायचे आणि दुसरीकडे मुस्लीम महिलांना बुरखावाटप करण्याचे ढोंग करायचे अशी दुट्ट्पी भूमिका शिंदे गटाची आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.

Story img Loader