मुंबई : जोगेश्वरीत पंचतारांकित हॉटेल उभारण्यात झालेल्या आर्थिक घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तपास बंद करण्याचा अर्ज न्यायालयात सादर करून शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना अभय दिल्याबद्दल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर टीका केली आहे. वायकर यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता कुठे गेले, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अभय देणे म्हणजे भाजपच्या धुलाई यंत्रामधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून वायकर हे सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी कारण सांगितले होते, अशी टीका पटोले यांनी केली.

BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
sanjay raut granted bail hours after being convicted in medha somaiya defamation case
Medha Somaiya Defamation Case : संजय राऊत यांना न्यायालयाचा अंशत: दिलासा, 30 दिवसांसाठी….
Haryana BJP President Mohan Lal Badoli and Mandi MP Kangana Ranaut
Kangana Ranuat : “कंगना रणौत बरळत असतात, पक्षाची भूमिका…”, कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपा नेत्यांनीच टोचले कान!
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!

हेही वाचा >>>आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल

जनतेला सांगा -वडेट्टीवार

गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा हवाला पोलिसांनी दिला आहे. यावरून गैरसमजातून गुन्हे दाखल होतात ही बाब पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळली आहे. गैरसमजातून असे अजून कोणते गुन्हे दाखल झाले आहेत हेसुद्धा लोकांसमोर यावे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तर, भाजप किंवा मित्र पक्षात प्रवेश केल्यावर यंत्रणांकडून अभय हा घटनाक्रमच तयार झाला आहे. असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

●ठाकरे गटात असताना वायकर यांच्या विरोधात जोगेश्वरीत मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

●ईडी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या घोटळ्याचा तपास केला होता. ईडीने वायकर यांची चौकशी केली होती. वायकर व त्यांच्या पत्नीला अटक होणार हे निश्चित झाले असताना वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून स्वत:ची सुटका करून घेतली होती.

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानेच वायकर यांना अभय मिळाले आहे. त्यांच्या विरोधातील चौकशी वा तपास बंद करण्यात आला आहे. उद्या हे सरकार कुख्यात दाऊदलाही अभय देईल. – संजय राऊत , खासदार, ठाकरे गट