नाशिक – ट्विटर, फेसबूकसह अन्य समाज माध्यमांवर किती जणांची खाती आहेत. त्यावर किती जण संदेश टाकतात. रोज संदेश टाकणारे किती आहेत, पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे ट्विट कितीजण रिट्विट करतात. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत असा प्रश्नोत्तराचा तास रंगला. त्यांची हात उंचावून उत्तरे घेण्यात आली. यातून काहिसे निराशाजनक वास्तव उघड झाल्याने माध्यमांवर सक्रिय नसणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांबाबत कठोर पवित्रा घेण्याची तंबी दिली गेली. आगामी लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुका समाज माध्यमांवरील प्रचार तंत्र अन् वातावरण निर्मितीवर लढल्या जातील. खरेतर भाजपा या माध्यमाचे महत्व प्रारंभापासून ज्ञात असणारा एकमेव पक्ष आहे. तथापि, आता विरोधकही त्यावर आव्हान देऊ लागल्याने धास्तावलेल्या भाजपाला ही माध्यमे नव्याने व्यापण्याची फेरमांडणी करावी लागत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा