Delhi Election 2025 Rahul Gandhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार टीका झाली. आगामी काळात हे दोन्ही पक्ष व त्यांचे नेते इंडिया आघाडीच्या एखाद्या बैठकीला उपस्थित राहतील तेव्हा हीच टीका गुंतागुंतीची ठरू शकते. या टीकेमुळे भविष्यातील आघाडीसमोर अडचणी येऊ शकतात. परंतु, ही टीका दोन्ही बाजूंसाठी अपरिहार्य होती. दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवणे हे काँग्रेसचे धोरण आहे. १९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे काँग्रेसकडे दिल्लीची सत्ता होती. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीची कमान दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे आपकडून सत्ता परत मिळवण्यासाठी १२ वर्षे राजधानी ज्यांच्या हाती होती अशा पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर टीका करणं, त्यांनी केलेल्या चुका जनतेसमोर मांडणं काँग्रेससाठी क्रमप्राप्तच होतं. त्यानुसार काँग्रेसने निवडणुकीत निकराने लढा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा