या वर्षाच्या एप्रिलमध्ये माहिती व प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चांद यांनी सांगितले की यंदाची अमरनाथ यात्रा ही ऐतिहासिक ठरणार आहे. हिमालयातील या धार्मिक यात्रेमध्ये सहा ते आठ लाख भाविक सहभागी होणार आहेत. या आधीच्या यात्रांचा विचार केला तर भाविकांची संख्या यंदा जवळपास दुप्पट असणार आहे.
केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठका घेतल्या असून मुख्यत: यात्रेकरूंच्या सुरक्षेवर भर देण्यात आला. तसेच प्रत्येक यात्रेकरूला पाच लाख रुपयांचे विमा कवच व सुरक्षेसाठी आरएफडी (रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅग देण्यात येणार आहेत. काश्मीरमधल्या अन्य गोष्टींप्रमाणेच अमरनाथ यात्राही काश्मीर खोऱ्यातल्या राजकारणाशी जोडली गेलेली आहे. पण यंदा जून ३० ते ऑगस्ट ११ या कालावधीत असलेल्या या यात्रेला वेगळे महत्त्व प्राप्त झालंय कारण ३७० कलम रद्द झाल्यानंतरची व करोनामुळे दोन वर्षांची दरी पडल्यानंतरची ही पहिली यात्रा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा