ठाणे : शिवसेना एकसंघ असताना ठाणे जिल्ह्यातील राजकीय समिकरणांची नव्याने मांडणी करत क्रमांक एकचा पक्ष बनू पहाणाऱ्या भाजपला अंतर्गत कुरबुरी, मतभेद आणि टोकाच्या स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या विसंवादाने ग्रासल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात येत्या काळातही पक्षाचा दबदबा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान या पक्षातील चाणक्यांना पेलावे लागणार आहे. नवी मुंबईत गणेश नाईक-मंदा म्हात्रे, मीरा-भाईदरमध्ये गीता जैन-नरेंद्र मेहता, मुरबाड-ग्रामीण पट्ट्यात किसन कथोरे-कपील पाटील, उल्हासनगरात कलानी कुटुंबियांशी जवळीकीतून निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पक्षातच होऊ घातलेले पाडापाडीचे उद्योग निस्तरण्याची वेळ आतापासूनच नेत्यांवर आली आहे. विशेष म्हणजे, या टोकाच्या मतभेदांमुळे उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांच्या पक्षांना आयते उमेदवार सापडू नयेत याची दक्षताही आता पक्षाला घ्यावी लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा