बिहारमधील जातनिहाय जनगणना आणि त्यापाठोपाठ या जनगणनेच्या आधारे आरक्षणात १५ टक्के वाढ करण्याच्या निर्णयामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढले आहे. मंडल आयोगामुळे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांची दुर्बल घटकांचे तारणहार किंवा ‘मसिहा’ अशी प्रतिमा निर्माण झाली होती. तशीच नितीशकुमार यांची प्रतिमा तयार होते का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

कधी भाजप तर कधी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करण्याच्या धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांची प्रतिमा संधीसाधू राजकारणी अशी झाली होती. याशिवाय त्यांचे राजकीय महत्त्वही कमी होत गेले होते. वास्तविक पंतप्रधान मोदी यांना पर्याय म्हणून नितीशकुमार यांचे नाव घेतले जात असे. पण मध्येच भाजपशी हातमिळवणी केल्याने नितीशकुमार यांच्या प्रतिमेला फटका बसला. भाजपला सोडून नितीशकुमार यांनी पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी केली.

Vasai Virar Municipal Corporation has published the VIP list in the city
पालिकेच्या व्हीआयपींच्या यादीत राजकारण्यांचा भरणा; शहरातील मान्यवर नागरिकांना वगळले
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
illegal migration in parts of Jharkhand
Bangladeshis marrying Jharkhand tribal women: बांगलादेशी नागरिक झारखंडच्या आदिवासी महिलांशी लग्न करतायत? भाजपाच्या दाव्याला केंद्रीय गृहखात्याची चपराक
What is the humanitarian crisis in Sudan
सुदानमधील लष्करी गटांतील संघर्षामुळे भीषण मानवतावादी संकट… पुढे काय होणार? भारताच्या हितसंबंधांना धोका?
increasing rate of unprotected sex among teenagers
पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंधांत वाढ! जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
The migration in 2022, supported by airborne foster parents.
नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी

हेही वाचा : शिंदे गटात ना नेते ना आमदारांवर कोणाचा वचकच नाही !

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करून नितीशकुमार यांनी आधी भाजपला मोठा धक्का दिला. कारण बिहारमधील जातनिहाय जनगणनेचे निष्कर्ष जाहीर होताच सर्वच राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली. जातनिहाय जनगणनेच्या निष्कर्षाच्या आधारे बिहारमधील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्यात आले. दुर्बल घटक, अतिमागासवर्ग आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्यात आली. १५ टक्के आरक्षणात वाढ करण्यात आल्याने बिहारमध्ये सामाजिक घुसळण करण्यात नितीशकुमार यशस्वी झाले आहेत. जातनिहाय जनगणना करून नितीशकुमार यांनी मुख्यत्वे भाजपची पंचाईत केली. जातनिहाय जनगणनेला आधी विरोध करणाऱ्या भाजपालाही भूमिका बदलावी लागली.

हेही वाचा : राजस्थान : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, दोन मोठ्या नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

आगामी लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार यांचे राजकीय महत्त्व वाढणार का, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. नितीशकुमार कितीही इन्कार करीत असले तरी त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. विरोधी आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे यावे, असा त्यांचा प्रयत्न असावा. यामुळेच इंडिया आघाडीच्या भवितव्याबद्दल नितीशकुमार यांनी गेल्याच आठवड्यात चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा : “सत्तेत आल्यास सक्तीच्या धर्मांतरावर बंदी,” राजनाथ सिंह यांचे आश्वासन

लोकसभेच्या ४० जागा असलेल्या बिहार वगळता नितीशकुमार यांच्या जनता दल (यू) पक्षाचे फारसे अस्तित्व नाही. उत्तर प्रदेशातही त्यांचे नेतृत्व कधी स्वीकारले गेलेले नाही. पण सामाजिक मुद्द्यावर ओबीसी, दुर्बल घटक, अनुसूचित जातींचा पाठिंबा मिळविण्यात नितीशकुमार यशस्वी झाल्यास त्यांचे राजकीय वजन वाढेल. उद्या, इंडिया आघाडीत नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास नितीशकुमार यांचा पर्याय निश्चितच असू शकेल.