गडचिरोली : अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. याचे हादरे गडचिरोलीलादेखील बसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाची शपत घेताच गडचिरोली भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आणि एक खासदार असताना इतर पक्षातील नेत्याची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. हा निर्णय घेताना जिल्ह्यातील एकाही नेत्याला विश्वासात न घेतल्याने ते खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात वरिष्ठ नेते म्हणून धर्मरावबाबा आत्राम यांची ओळख आहे. १९९० साली अहेरी विधानसभेतून निवडून आल्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचे सूत्र कायम अहेरी येथील राजघराण्यातून हलविल्या जातात. त्याच राजघराण्यातून धर्मरावबाबा येतात. त्यांचे राजकीय वलय दुर्लक्षित करण्यासारखे नसल्याने त्यांना तीनदा राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. परंतु यावेळी अजित पवारांसोबत भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांना स्थान मिळाल्याने गडचिरोलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे वळण घेणार असल्याची चर्चा आहे. यात सर्वाधिक अस्वस्थता भाजपच्या गोटात आहे. मात्र, वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयावर उघडपणे बोलण्यास ते तयार नाही.

sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
samarjeetsinh ghatge bjp ncp marathi news
कोल्हापूरच्या ‘समरा’त पवारांची ‘जीत’, घाटगेंच्या प्रवेशामुळे मुश्रीफांसमोर आव्हान

हेही वाचा – पुण्यातील कट्टर प्रतिस्पर्धी आता एकत्र

मंत्रिमंडळ विस्तारात शेवटी का होईना आम्हाला स्थान मिळणार अशी आशा आमदार कृष्णा गजबे आणि डॉ. देवराव होळी यांना होती. तसा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा केला आहे. तर दुसरीकडे धर्मरावबाबांनी येणारी लोकसभा लढविणार असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचे खासदार अशोक नेते यांची चिंता वाढली आहे. अहेरी विधानसभेतदेखील मंत्री आत्राम यांचे पुतणे भाजपचे नेते माजी राज्यमंत्री अम्ब्रीश आत्राम यांची उमेदवारीदेखील धोक्यात आली आहे. मागील वेळेस मोदी लाटेत धर्मरावबाबांनी त्यांचा पराभव केला होता. यंदा बाबांच्या कन्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी अहेरी विधानसभा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाबा त्याही जागेवर दावा करणार आहेत. अशा स्थितीत भाजपकडून अम्ब्रीश आत्राम यांना उमेदवारीसाठी नकार मिळू शकते. एकंदरीत रविवारची राजकीय घडमोड भाजप नेत्यांनाच अडचणीत आणणारी आहे. अशी चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

हेही वाचा – काँग्रेसला अजून तरी फुटीचे ग्रहण नाही

खासदार अशोक नेतेंची उमेदवारी धोक्यात?

गडचिरोली-चिमूर लोकसभा मागील दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. मर्यादित जनसंपर्क आणि सत्ताविरोधी वातावरणाचा फटका यंदा खासदार अशोक नेते यांना बसू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शंका उपस्थित करणारी चर्चा वर्षभरापासून भाजपच्याच गोटात होती. त्यात धर्मरावबाबांना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चादेखील होती. रविवारच्या मंत्रिमंडळविस्तारात बाबांना स्थान मिळाल्याने अशोक नेते यांची उमेदवारी संकटात सापडली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी धर्मरावबाबा आत्राम भाजपचे पुढचे उमेदवार राहणार अशी चर्चा कालपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.