संतोष प्रधान

महाविकास आघाडीत जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने २२ जागा लढविण्याचे जाहीर करून १७ जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली. तसेच मुंबईत चार जागांवर उमेदवार जाहीर करून उत्तर मुंबईचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीत काँग्रेसची चांगलीच फरफट झाली आहे. शिवसेनेच्या या आक्रमक चालीमुळे काँग्रेसला आणखी गळती लागण्याची चिन्हे आहेत.

suvendu adhikari Mamata Banerjee
‘आता बंगालची पाळी’, दिल्ली विजयानंतर भाजपा नेत्याचे ममता बॅनर्जींना आव्हान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rohit Pawar On Delhi Election Result
Rohit Pawar : “…तर भाजपाच्या २० जागाही आल्या नसत्या”, रोहित पवारांची दिल्लीच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. वास्तविक सांगलीत शिवसेनेच्या ठाकरे गटापेक्षा काँग्रेसची ताकद अधिक आहे. तरीही शिवसेनेने दबावाचे राजकारण करून काँग्रेसवर मात केली. सांगलीत शिवसेनेचा निभाव लागणे कठीण असल्याचे काँग्रेसचे नेते आता उघडपणे बोलू लागले आहेत.

आणखी वाचा-“गरीब व श्रीमंतांमध्येही काँग्रेस दुरावत असल्याची भावना”, ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे खडे बोल

मुंबईतील सहापैकी चारा जागांवर शिवसेनेने उमेदवारी जाहीर केले. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई हे दोनच मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी आहे. यापैकी उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघातून कोणीही लढण्यास फारसे उत्सूक नाही. मुंबईत मराठी आणि मुस्लीम या मतांच्या आधारे यश मिळवू शकतो, असा ठाकरे गटाला विश्वास वाटतो. मुस्लीम मतांवर शिवसेना ठाकरे गटाची भिस्त असली तरी ही मते किती प्रमाणात मिळतील यावरही सारे गणित अवलंबून आहे. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत मुस्लीम मतदान तेवढे होत नाही, असाही अनुभव आहे. मुंबईत काँग्रेसची साथ किती मिळते हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वांना बरोबर घ्यावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पण शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे आघाडीत सख्य राखण्याचे मोठे आव्हान असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांची मते परस्परांकडे हस्तांतरित होतात. पण शिवसेना ठाकरे गटाची मते समोर शिंदे गटाचा उमेदवार असल्यास त्याकडे वळू शकतात. यामुळेच महाविकास आघाडीत मतांचे हस्तांतरण हे मोठे आव्हान आहे.

आणखी वाचा-पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

पश्चिम महाराष्ट्रात एक जागा हवी असल्याने सांगलीची जागा लढवित असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पण सांगलीत शिवसेनेची ताकद किती, असा प्रश्न काँग्रेसचे नेते करीत आहेत. सांगलीत भाजपचा विजय अधिक सोपा झाल्याचीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना २० व काँग्रेसला १८ किंवा १९ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी होती. पण शिवसेनेने परस्पर २२ जागा लढविण्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ १७ जागा येणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला ९ जागा येणार आहेत.

Story img Loader