ठाणे : श्रीनगर भागातील काँग्रेसचे प्रभावी नेते मनोज शिंदे यांना पक्षात आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी या आपल्या विधानसभा मतदार क्षेत्र विरोधकमुक्त करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे. नारायण राणे यांचे एकेकाळचे कडवे समर्थक रविंद्र फाटक यांना काही वर्षांपूर्वी शिंदेंनी असेच स्वपक्षात घेतले आणि मतदारसंघातील कडवा विरोधक ‘संपवला’. या मतदारसंघात भाजपची ताकदही वाढू लागली होती. उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा वाढता प्रभावही रोखला. आता काँग्रेस नेते मनोज शिंदे यांना पक्षात आणून संपूर्ण मतदारसंघावर त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा सुरुवातीपासून बालेकिल्ला असला तरी काँग्रेस विचारांना मानणारा एक मोठा वर्ग येथे होता. जुन्या ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये तयार झालेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे हे आमदार झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहणारे मनोज शिंदे यांनी ४० हजार ७२६ (२५.१३ टक्के) इतकी मते घेतली. २०१४ या मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले. यावेळी भाजपमधून उभे राहिलेले संदिप लेले यांनी ४८ हजार ४४७ (२६.२४ टक्के) इतकी मते घेतली. लेले यांना मिळालेली मते अनेकांना अचंबित करणारी होती. याच काळात मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील विरोधक एक-एक करून पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. वागळे इस्टेटमधील रघुनाथ नगर, रहेजा या सारख्या भागात प्राबल्य राखून असणारे नारायण राणे समर्थक रविंद्र फाटक यांना त्यांनी पालकमंत्री होताच पक्षात घेतले. फाटक हे या भागातील पाच ते सहा प्रभागांवर वर्चस्व राखणारे नेते समजले जातात. त्यांना विधान परिषद बहाल करून शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातला मोठ्या विरोधकाचे पंख कापले. लेले यांना मिळालेली मते पाहून भाजपचा प्रभाव आपल्या मतदारसंघात फार राहणार नाही याची पद्धतशीरपणे त्यांनी काळजी घेतली. २०१४ ते २०१९ त्यांनी भाजपशी जुळवून घेतले. २०२२ नंतर त्यांनी या पक्षाशी घरोबाच मांडला. तत्पुर्वी २०१९ साली झालेल्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांना त्यांनी ९० हजार मतांच्या फरकाने आसमान दाखविले. वागळे इस्टेटमधील ठराविक प्रभागांमधून निवडून येणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांची त्यांनी डाळ शिजून दिली नाही.

Chandrakant Patil demand to Deputy Chief Minister Eknath Shinde regarding the traffic congestion problem Pune news
अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा – नाना पटोलेंच्या भ्रमाचा भोपळा फुटला; साकोलीत लाजिरवाणा विजय!

श्रीनगर भागातील मनोज शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय हे एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक मानले जात होते. २०१७ साली पॅनल पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमधील चारही जागांवर मनोज शिंदे, त्यांचे बंधू शैलेश शिंदे आणि इतर दोन काँग्रेस उमेदवारांचा पाडाव केला. श्रीनगर आणि आसपासच्या पट्ट्यात असलेला खेड, चिपळून, रत्नागिरी पट्ट्यातील कोकणी मतदार हा मनोज शिंदे यांची ताकद मानली जात असे. आपल्या पक्षातील स्थानिक कोकणी नेत्यांना ताकद देत एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांचा गड काबीज केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना कोपरी-पाचपाखाडीत कोणताही प्रबळ विरोधक राहिलेला नाही. यावेळेस त्यांच्याविरोधात कोणाला उभे करावे, असा प्रश्न ठाकरे गटासमोर होता. आनंद दिघे यांचे पुतणे म्हणून केदार यांना रिंगणात उतरविण्यात आले. त्यांचाही शिंदे यांनी इतक्या मतांच्या फरकाने धुव्वा उडवला. विशेष म्हणजे जिंकून आल्यावर दुसऱ्याच दिवशी मनोज शिंदे यांना पक्षात घेत आपल्याच एका कडव्या विरोधकाला त्यांनी ‘शांत’ केले आहे.

हेही वाचा – देवतळे कुटुंबाची धानोरकर कुटुंबावर मात; ७० वर्षांनंतर वरोऱ्यात कमळ फुलले

काँग्रेस पक्षातील अनेक कर्तुत्वान नेते सोडून गेले. यानंतरही आम्ही पक्षाचे काम करित राहिलो. परंतु कोकण पट्ट्याकडे पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. भिवंडी पश्चिमेत काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात मित्र पक्षांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. परंतु पक्षाने मात्र माझ्यावर पहिली कारवाई केली. यासंबंधीचे पत्र पक्षाच्या नेत्यांना पाठविले पण, त्याचीही दखल नेत्यांनी घेतली नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात अनेक विकासकामे केली. अशा कर्तुत्वान मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देणे गरजेचे असल्यामुळे मी त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया मनोज शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.

Story img Loader