महेश सरलष्कर

आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून भाजपविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार ही पाटण्यात शुक्रवारी तब्बल चार तास झालेल्या विरोधकांच्या बैठकीतील सकारात्मक बाब ठरली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नसला तरी, महाआघाडीसाठी एक पाऊल पुढे टाकले गेले असे म्हणता येऊ शकेल.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
yamuna river poisonous
यमुनेत विष मिसळल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपाने खळबळ; प्रकरण काय?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

या बैठकीत काँग्रेसने दाखवलेली लवचिकता महत्त्वाची ठरली. आमच्या मध्ये मतभेद असतील पण, ते राष्ट्रहितासाठी बाजूला ठेवू. त्यासाठी आम्ही लवचिकता दाखवू. देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात असताना भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. विरोधकांचे ऐक्य ही प्रक्रिया असून ती पुढेही कायम राहील, असे राहुल गांधी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाआघाडीची दुसरी बैठक काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यामध्ये होणार आहे. हे पाहता ‘आप’ वगळता इतर भाजपेतर प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी केली असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा… मोदींच्या पराभवासाठी विरोधक येणार एकत्र; पुढच्या महिन्यात जागावाटपावर चर्चा; शिमला येथे होणार बैठक!

बैठकीत ‘आप’ने वटहुकुमाच्या मुद्द्यावर काँग्रेसला धारेवर धरल्याने चर्चेमध्ये मीठाचा खडा पडला. काँग्रेसने या बैठकीतच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे केजरीवाल आणि राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये तीव्र संघर्ष झाल्याचे समजते. आपापसांतील मतभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये कसा समन्वय साधला जातो, हे शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आप व काँग्रेसमध्ये तडजोड न झाल्याने कदाचित ‘आप’ महाआघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… “…तर वेगळा निर्णय घेऊ” आम आदमी पार्टीच्या अल्टिमेटमला खर्गे यांनी दिले उत्तर; म्हणाले “पाठिंबा द्यायचा की नाही हे…. “

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल व द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे दोघे वगळता सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. तिथे ममता बॅनर्जी यांच्यासह ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी व ‘भाकप’चे महासचिव डी. राजा यांनीही विरोधकांच्या ऐक्यावर ठाम असल्याचे सांगितले. जे इथे उपस्थित नाहीत त्यांची चिंता करण्यापेक्षा जे नेते हजर आहेत, त्यांनी केलेला एकजुटीचा निर्धार महत्त्वाचा असल्याचे नॅशनक कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांना चपराक दिली. वटुहुकमाच्या मुद्द्यापेक्षा विरोधकांच्या ऐक्याला सर्व नेत्यांनी प्राधान्य दिल्यामुळे या बैठकीनंतर केजरीवाल एकटे पडल्याचे दिसले!

हेही वाचा… भारत राष्ट्र समितीचे लक्ष आता पुण्याकडे

पश्चिम बंगालमध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. पण, पाटण्यातील बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांचे ऐक्य झाले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढू, असे निःसंदिग्धपणे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये माकप- काँग्रेस आघाडी तृणमूल काँग्रेस विरोधात लढत असली तरी, देशाचे संविधान हा आमच्या मधील समान धागा असल्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी व काँग्रेस एकमेकांविरोधात लढले. पण, भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधक एकत्र असतील असे सपचे प्रमुख अखिलेश यादवही म्हणाले. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल वगळता सर्व विरोधी पक्षनेत्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्धार केल्याचे दिसले. पाटण्यातील बैठक ही महाआघाडीची सुरुवात असून सिमल्यातील चर्चेमध्ये किमान समान कार्यक्रम, एकास एक उमेदवार देण्याचे सूत्र, जागावाटप आदी कळीच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Story img Loader