छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या नेत्यांची छायाचित्रे लाऊन, ढोल वाजवत आणि घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील तिन्ही जागांवर विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ आता पूर्णत: गेल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीतून दिसून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचार महायुतीच्या सरकारला शेतकरी विरोधी ठरविण्याकडे असेल, असे संकेतही विभागीय आढावा बैठकीतून देण्यात आले. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
तेलंगणातील पराभवानंतर के. चंद्रशेखर राव कुठे आहेत? बीआरएसचे नेतृत्व कुणाकडे? (फोटो सौजन्य पीटीआय)
Telangana Politics : तेलंगणातील राजकारणात केसीआर ‘पुन्हा परत येणार’; एवढा काळ ते होते कुठे?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
Ahead of municipal elections Congress office bearers are leaving party in Navi Mumbai
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षफुटीचे सत्र सुरू, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

हेही वाचा – लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

चेन्निथल्ला म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. मराठवाडा तर शेतकरी आत्महत्येचा प्रदेश झाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७७ आत्महत्या आहेत. त्याच जिल्ह्याचे नेतृत्व कृषिमंत्री करत आहेत. कापूस, सोयाबीन उत्पादक हैराण आहेत. नुसतीच मोठी आश्वासने दिली जात आहेत. केंद्र सरकारलाही या क्षेत्रात योगदान देता आले नाही. त्यांनी शेतकरी विरोधी केलेले तीन कायदे आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना ते विसरुन गेले आहेत.’ छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार बैठकीत त्यांनी हा आरोप केला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळाचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यांच्यासह खासदार कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा – Himanta Biswa Sarma : भूमी व खत जिहादनंतर आता ‘पूर जिहाद’, आसामच्या मुख्यमंत्र्यांची मुसलमानांवर आगपाखड; गुवाहाटीतील पुरावरून…

काँग्रेस नेत्यांच्या भाषणाबरोबरच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये साेमवारी उत्साह पहावयास मिळाला. छत्रपती संभाजीनगरमधील जितेंद्र देहाडे, कन्नडमधून इच्छुक नामदेव पवार, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, परतूरमधून कल्याण बोराडे यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देताना उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्याही घोषणा दिल्या. या घोषणांची दखल काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात आवर्जून घेतली. ते म्हणाले, ‘दोन दिवसांपासून मराठवाड्यात काँग्रेसचे नेते बैठका घेत आहेत. लातूर व नांदेडमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह होता. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये वाजणारे ढोल, मिरवणुकांनी येणारे कार्यकर्ते, घोषणाबाजी हे खूप चांगले आहे. दोन दिवसांपूर्वी असे काही सांगितले असते तर आम्हीही लातूरमध्ये ते केले असते.’ असे म्हणत अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे कौतुकही केले आणि त्याच वेळी उमेदवारी मागणाऱ्यांना हळूच चिमटाही काढला. आता जे इच्छुक उमदेवार आहेत त्यांना शुभेच्छा आणि उमेदवारी मिळाल्यावर अभिनंदन करू, असे म्हणत अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील ४६ पैकी किती जागा काँग्रेस लढवेल याचे तीन आकडे कार्यकर्त्यांसमोर ठेवले. ते म्हणाले, ‘मराठवाड्यात ४६ मतदारसंघ आहेत. त्यातील १८, २० किंवा २५ जेवढ्या जागा मिळतील, त्या सर्व जागा निवडून आणण्याचा संकल्प करू’ असे अमित देशमुख म्हणाले.

Story img Loader