छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या नेत्यांची छायाचित्रे लाऊन, ढोल वाजवत आणि घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील तिन्ही जागांवर विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ आता पूर्णत: गेल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीतून दिसून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचार महायुतीच्या सरकारला शेतकरी विरोधी ठरविण्याकडे असेल, असे संकेतही विभागीय आढावा बैठकीतून देण्यात आले. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ?
Hoardings, Navi Mumbai, MLA, businessmen,
नवी मुंबई : भावी आमदारांची फलकबाजी, जागोजागी लागलेल्या होर्डिंगमुळे शहर विद्रुप, फलक व्यावसायिकांना नोटिसा
AIMIM , Imtiaz Jaleel, constituency confusion,
इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम
BJP, Murlidhar Mohol, Pune, assembly elections, Kasba constituency, bjp lok sabha set back, party strategy, Parvati Assembly constituency, Pune Cantonment Assembly constituency,
मुरलीधर मोहोळांचे पक्षातील वजन वाढले, विधानसभेसाठी दिली मोठी जबाबदारी
Chandrapur, Congress, Ayarams, loyalists, assembly elections, Maha vikas Aghadi, candidature, party tensions, Maharashtra assembly election 2024,
आयारामांमुळे काँग्रेस निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ

हेही वाचा – लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

चेन्निथल्ला म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. मराठवाडा तर शेतकरी आत्महत्येचा प्रदेश झाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७७ आत्महत्या आहेत. त्याच जिल्ह्याचे नेतृत्व कृषिमंत्री करत आहेत. कापूस, सोयाबीन उत्पादक हैराण आहेत. नुसतीच मोठी आश्वासने दिली जात आहेत. केंद्र सरकारलाही या क्षेत्रात योगदान देता आले नाही. त्यांनी शेतकरी विरोधी केलेले तीन कायदे आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना ते विसरुन गेले आहेत.’ छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार बैठकीत त्यांनी हा आरोप केला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळाचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यांच्यासह खासदार कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा – Himanta Biswa Sarma : भूमी व खत जिहादनंतर आता ‘पूर जिहाद’, आसामच्या मुख्यमंत्र्यांची मुसलमानांवर आगपाखड; गुवाहाटीतील पुरावरून…

काँग्रेस नेत्यांच्या भाषणाबरोबरच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये साेमवारी उत्साह पहावयास मिळाला. छत्रपती संभाजीनगरमधील जितेंद्र देहाडे, कन्नडमधून इच्छुक नामदेव पवार, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, परतूरमधून कल्याण बोराडे यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देताना उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्याही घोषणा दिल्या. या घोषणांची दखल काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात आवर्जून घेतली. ते म्हणाले, ‘दोन दिवसांपासून मराठवाड्यात काँग्रेसचे नेते बैठका घेत आहेत. लातूर व नांदेडमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह होता. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये वाजणारे ढोल, मिरवणुकांनी येणारे कार्यकर्ते, घोषणाबाजी हे खूप चांगले आहे. दोन दिवसांपूर्वी असे काही सांगितले असते तर आम्हीही लातूरमध्ये ते केले असते.’ असे म्हणत अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे कौतुकही केले आणि त्याच वेळी उमेदवारी मागणाऱ्यांना हळूच चिमटाही काढला. आता जे इच्छुक उमदेवार आहेत त्यांना शुभेच्छा आणि उमेदवारी मिळाल्यावर अभिनंदन करू, असे म्हणत अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील ४६ पैकी किती जागा काँग्रेस लढवेल याचे तीन आकडे कार्यकर्त्यांसमोर ठेवले. ते म्हणाले, ‘मराठवाड्यात ४६ मतदारसंघ आहेत. त्यातील १८, २० किंवा २५ जेवढ्या जागा मिळतील, त्या सर्व जागा निवडून आणण्याचा संकल्प करू’ असे अमित देशमुख म्हणाले.