अमेरिका आणि जगाच्या इतर भागांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (CAA) टीका सुरू आहे. त्यावरच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या दोन दिवसीय कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीएएवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाश्चात्य देशांनाही आरसा दाखवला. भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी सीएएवर केलेल्या टिप्पणीवर जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, असे विधेयक आणणारा भारत हा पहिला देश नाही. जगात अशा कायद्यांची अनेक उदाहरणे आहेत. मी त्यांच्या (अमेरिकन) लोकशाहीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करत नाही, त्यांची तत्त्वे किंवा इतर कशावरही मी टिपण्णी करीत नाही. आमचा इतिहास काय आहे, याबद्दल मी त्यांच्या आकलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. जर तुमच्याकडे माहिती नसेल तर उद्या तुम्ही म्हणाल की, भारताची फाळणी कधी झालीच नाही. फाळणीची समस्या सोडवण्यासाठी सीएए कायदा आणल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा