लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मालवण येथील पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडी सरकार महायुती सरकारला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी वादग्रस्त विधान केले. ‘महापुरुषांचे पुतळे मोडतोड झाल्यास दंगली होतात. गावे पेटतात. आणि इथे एवढे होऊन काहीच होत नाही.’ त्यांच्या या विधानाने शिवसेना शिंदे गटाला आयते कोलीत हाती मिळाले आहे.

Mahavikas Aghadi protest in response to the collapse of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Malvan case print politics news
भाजपचे ‘खेटरे मारा’ आंदोलनाने उत्तर; पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
Kalidas Kolambkar in Wadala Assembly Election 2024 Marathi News
कारण राजकारण: कालिदास कोळंबकर यांना यंदाची निवडणूक कठीण?
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”

ठाकरे गटाला महाराष्ट्र अशांत करायचा आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मालवण पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडीने मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्यासाठी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढला. हुतात्मा चौकात प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांची जीभ घसरली. ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड होते. त्या ठिकाणी दंगली होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्यास गावच्या गावे पेटतात. मालवणात एवढे होऊनही सरकारच्या विरोधात कोणी काही बोलत नाही. सरकारच्या विरोधात बोलायचे नाही का? हे सरकार पदच्युत झाले पाहिजे होते. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आम्ही हे सहन करणार नाही असे खैरे म्हणाले.