मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन जेवढ्या कामांच्या फिती कापायच्या असतील तेवढ्या कापून घ्याव्यात. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आणि तुमच्या गद्दार मित्रांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले सर्व गद्दार बेरोजगार होणार आहेत. त्यानंतर ते आपल्याकडे रोजगार मागायला येतील, पण एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या रोजगार मेळाव्यात शिंदे गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा >>> शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यासह अनेक नगरसेवकांचा रविवारी ठाकरे गटात प्रवेश?

BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
लेख: ही पूर्वनियोजित चकमक कोणाच्या सांगण्यावरून?
man Committed to suicide after getting tired of being harassed by mother-in-law and wife
सासू, पत्नीसह चौघांच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या
Counter movement by OBC leaders opposing Manoj Jarange agitation for Maratha reservation demand
आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलनप्रतिआंदोलनाने वाद
seven women burnt by firecrackers during Ganpati immersion in umred
Video : फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना

आमदार अॅड. अनिल परब यांनी आयोजित केलेल्या ह्यमहानोकरीह्ण मेळाव्याचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी पार पडले. या कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात १५ तरुणांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला लक्ष्य केले. गद्दारी केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपल्या राज्यात कोणीही गुंतवणूकदार यायला तयार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

मराठी माणूस तो फलक तोडेल

मराठी माणसांना रोजगार नाकारणाऱ्या कंपन्यांचा या वेळी ठाकरे यांनी समाचार घेतला. मधल्या काळात मराठी माणसाला नोकरीमध्ये ‘नो एण्ट्री’च्या जाहिराती आल्या होत्या, पण असे बोर्ड ज्या दारावर लागतील ते दार तोडून टाकून मराठी माणूस आतमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देताना प्रत्येक राज्यामध्ये भूमिपुत्रांचा मान राखला गेलाच पाहिजे, असे ठाकरे यांनी ठणकावले.