अविनाश कवठेकर

पुणे : राज्यातील सरकार बदलले असले तरी जिल्ह्यातील सरकार बदलले आहे, असे वाटत नाही. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घ्यावा लागणार आहे, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पवार कुटुंबाच्या प्रशासनावरील अप्रत्यक्ष प्रभावाबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे मंगळवारी खंत व्यक्त केली.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CM Devendra Fadnavis On Varsha Bungalow
Devendra Fadnavis : वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे?… फडणवीसांनी टाकला सगळ्या चर्चांवर पडदा
Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
The startup ecosystem needs process restructuring along with financial support from the budget print eco news
नवउद्यमी परिसंस्थेला अर्थसंकल्पातून आर्थिक पाठबळासह प्रक्रियेच्या पुनर्रचनेची गरज
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?

हेही वाचा… लातूर जिल्ह्यात पालिका निवडणुकीची धामधूम

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये येऊन आढावा घेतला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, राज्यातील सत्ता बदलली आहे. मात्र जिल्ह्यातील सरकार बदलले आहे, असे दिसत नाही. हा विषय गांभीर्याने कसा घ्यायचा, हे या मोठ्या व्यासपीठावर सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या अडीच वर्षात भाजप कार्यकर्त्यांनी साधा अर्ज दिला तरी तो फेकून दिला जायचा. आता विरोधी पक्षातील लोक रात्री-अपरात्री भाजप नेत्यांना भेटत आहेत. मी तुमचाच आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आमची कामे करा, असे ते सांगत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजप नेत्यांना भेटू नये, असे नाही. मात्र यापुढे राजकारण करताना दक्ष रहावे लागणार आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील. बूथ पातळीपर्यंत काम करावे लागणार आहे. बऱ्याच तालुक्यात यंत्रणा सक्षम नाही. शेवटच्या काही दिवसांत कार्यकर्ते कमी पडतात. त्यामुळे बूथनिहाय पक्ष संघटन मजबूत करावे लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader