Maharashtra Elections : ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे निकाल लागले. हरियणात काँग्रेस जिंकणार असे अंदाज सगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवले होते. मात्र सगळे अंदाज फोल ठरवत हरियाणात भाजपाने बाजी मारली. भाजपाला हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ( Maharashtra Elections ) आजच जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ( Maharashtra Elections ) होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. याआधी सोमवारी काँग्रेस नेत्यांची एक बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या दिग्गजांना पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.

महाराष्ट्रातील दिग्गजांना राहुल गांधीचा सल्ला काय?

सोमवारी दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना हरियाणाच्या निकालातून शिका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ( Maharashtra Elections ) वेळी पाय जमिनीवर ठेवा असं बजावलं आहे अशी माहिती समोर आली आहे. अतिआत्मविश्वासामुळे सत्ता हातातून जाते, महाराष्ट्राच्या बाबतीत ही चूक करु नका. हरियाणात दुधाने पोळल्याने आता राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ताकही फुंकून पिण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. तसंच प्रत्येक पाऊल उचलताना काळजी घ्या असंही राहुल गांधींनी या बैठकीत बजावल्याचं कळतं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Amol Kolhe On Jayant Patil
Amol Kolhe : अमोल कोल्हेंचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं सर्वोच्च पद…”
Ramraje Naik Nimbalkar, Satara,
सातारा : रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षांतराचे वृत्त फेटाळले
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूकही लढवणार
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
bjp, maharashtra assembly
“महाराष्ट्र जिंकल्यास देश जिंकल्याचा संदेश”, अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन

झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यात

काँग्रेससह इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखण्यात बऱ्याच अंशी यश मिळवलं. त्यानंतर काँग्रेस पक्ष हरियाणा आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेल्या निवडणुकीला सामोरा गेला होता. तसंच आता आज जाहीर झाल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणुका ( Maharashtra Elections ) पुढच्या महिन्यात पार पडत आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी आस्ते कदमचा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांना सामोरे जाताना अतिआत्मविश्वास बाळगू नका, पाय जमिनीवर ठेवा असं राहुल गांधींनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितलं आहे.

हे पण वाचा- Baba Siddique : बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या, राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “ही घटना…”

महाविकास आघाडीची लोकसभेला चांगली कामगिरी

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तीन पक्ष एकत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी ३१ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. लोकसभेत चांगलं यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र राहुल गांधींनी आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ( Maharashtra Elections ) पार्श्वभूमीवर हुरळून न जाण्याचा आणि हरियाणाच्या निकालातून शिकण्याचा सल्ला दिला आहे.