आसाममधील भाजपामध्ये सध्या अंतर्गत वितंडवादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याविरोधात भाजपाच्या जुन्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीमधून भाजपाचे जुने वरिष्ठ नेते अशोक शर्मा यांनी भाजपाला रामराम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले आहे. सध्या आसाम भाजपामध्ये दुफळी माजल्याचे चित्र आहे. अशोक शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते असून त्यांनी २०१६ ते २०२१ या दरम्यान नलबाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी सर्बानंद सोनोवाल हे आसाममधील भाजपाच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारचे नेतृत्व करत होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये, पक्षाने त्यांना तिकीट देण्याऐवजी २०१५ मध्ये पक्षात सामील झालेले काँग्रेस नेते जयंता मल्ला बरुआ यांना नलबाडी मतदारसंघातून तिकीट दिले. सध्या हेमंत शर्मा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि बरुआ आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा