नितीश कुमार यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपा जनता दल युनायटेड ( जेडीयू ) फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप करत नितीश कुमारांनी युती तोडली. त्यानंतर नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाबरोबर ( राजद ) सत्ता स्थापन केली. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर आता महागठबंधनमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसत आहे.

राजदच्या सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितल्यानुसार, राजदच्या मंत्र्यांना त्यांच्या मर्जीनुसार सचिव आणि अन्य प्रशासकीय अधिकारी मिळाले नाहीत. यापूर्वीही, २०१७ साली नितीश कुमारांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजदची साथ सोडण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर जेडीयूने पुन्हा एकदा भाजपासमवेत सत्ता स्थापन केली होती. त्यात आता पुन्हा मर्जीतील अधिकारी न मिळाल्याने राजदतील अनेक मंत्री नाराज असल्याचं चित्र आहे.

BJP MNS Thackeray groups are aggressive after getting bail for the accused who molested a minor girl thane news
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: आरोपीला जामीन मिळाल्याने भाजप, मनसे, ठाकरे गट आक्रमक
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Balasaheb Thorat phone call, Sudhir Mungantiwar,
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले?
supriya sule remarks on candidate selection process in sharad pawar
“मी त्यांना दुखवून कुठलाही निर्णय घेणार नाही”, उमेदवार निवडीवरून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?

हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटके यांचा प्रचारासोबतच मतदानविषयक जनजागृतीवर भर

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या वादावरून राज्याचे राजदचे आमदार सुधाकर सिंह यांनी कृषी मंत्री पदावर पाणी सोडलं होतं. त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला बोलताना म्हटलं, “अनेकवेळा स्मरणपत्रे देऊन देखील माझ्या विभागातील सचिवांनी मला माहिती पुरवली नाही. परंतु, मुख्यमंत्री माझ्या खात्यातील सचिवांचे गुणगाण गात होते. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.”

“नवीन सरकार स्थापन झाल्यावर मर्जीतील अधिकारी निवडण्याचा अधिकार मंत्र्यांना असतो. मात्र, जेडीयू आणि राजद सरकारमधील अनेक मंत्र्यांचे सचिव थेट मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करत आहेत. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरूनही सरकारमध्ये मतभेद आहेत,” असे राजदच्या एका नेत्याने सांगितलं.

हेही वाचा : ‘ट्रॅफिकचे नियम तोडले तरी दंड नाही,’ गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा, पण अपघातांची आकडेवारी मात्र चिंता वाढवणारी!

याप्रकरणावर तेजस्वी यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तरीही, राजदमधील अनेक नेते यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “राजद हा महागठबंधनचा एक मोठा साथीदार आहे. नितीश कुमार यांनी राजदला गृहीत धरून चालू नये. पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. तेजस्वी यादव यांनी २०२० साली विधानसभेत स्वबळावर ८० आमदार निवडून आणले आहेत. तेजस्वी यादव यांचे राजकीय वजन वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचं,” एका राजदच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं.