अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघात घर बांधून मोठा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी त्यांचे पती झुबिन इराणी यांच्यासह त्यांनी विधिवत गृहप्रवेशही केला. डोक्यावर कलश घेऊन वेदमंत्रांचा जप करत स्मृती यांनी घरात पाऊल ठेवलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांनी अमेठीच्या जनतेला आश्वासन दिले होते की, त्या येथील खासदार झाल्या तर अमेठीच्या जनतेला खासदाराला भेटण्यासाठी दिल्लीला जावे लागणार नाही. त्याच वचनाची पूर्तता करण्यासाठी स्मृती इराणी यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात घर बांधल्याचं बोललं जात आहे. परंतु इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून निवडून आल्यानंतर तिथेच घर बांधल्यामुळे उमेदवार हा तिथल्या मतदारसंघाचा रहिवासी असणे आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इराणी यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा