उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. त्याआधीच मशिदीवर दावे सांगणाऱ्या अनेक याचिका विविध न्यायालयांत दाखल होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले आहे. मागच्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या तीन याचिका दाखल झाल्या असून, राजस्थानच्या अजमेर न्यायालयात अजमेर शरीफ दर्ग्यावर दावा सांगणारी एक याचिका दाखल झाली आहे. १९ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या चंदौसी न्यायालयात संभल येथील शाही जामा मशिदीवर हिंदूंनी दावा सांगितला. त्याच दिवशी न्यायालयाने मशिदीत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आणि प्रशासनाने सायंकाळी कार्यवाही सुरू केली. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा मशिदीत सर्वेक्षणासाठी जात असताना स्थानिकांनी जोरदार विरोध केला. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात चार लोकांचा मृत्यू झाला. संभलच्या घटनेनंतर मशिदीच्या जागेवर दावा करण्याची प्रकरणे पुढे येत आहेत. बदायूंमधील शम्शी शाही मशीद, तसेच जौनपूरमधील अटाला मशिदीबाबतही असाच प्रकार पुढे आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा