संतोष प्रधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार विधान परिषदेत अल्पमतात असल्याने विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना विधान परिषदेत मंजुरी मिळणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु विधान परिषदेने एखादे विधेयक रोखले वा चर्चेलाच घेतले नाही तरी घटनेतील तरतुदीनुसार हे विधेयक मंजूर करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. यामुळे विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यात काही अडथळा येत नाही.

Controversy over the decisions taken by the government even after the implementation of the code of conduct for assembly elections 2024
सरकारकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतलेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Action warning by fellow police commissioners for violation of code of conduct
आचारसंहितेचा भंग केल्यास सहपोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा
seven MLA, High Court, Maharashtra Government,
स्थगिती नसल्यानेच सात आमदारांच्या नियुक्त्या, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
BJP assembly manifesto, BJP, implementation plan BJP,
भाजपचा विधानसभा जाहीरनामा आता ‘अंमलबजावणी आराखड्या’च्या स्वरुपात
Jammu and Kashmir National Conference Vice President Omar Abdullah with LG Manoj Sinha in Srinagar.
Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा, राष्ट्रपतींच्या नव्या अधिसूचनेत नेमकं काय?
Hadapsar Vidhan Sabha, Shivsena officials went to Varsha, Shivsena Varsha bungalow, Nana Bhangire, pune Shivsena officials, loksatta news,
पुणे : शिवसेना पदाधिकारी गेले ‘वर्षा’ बंगल्यावर, ‘हे’ आहे कारण!
maharashtra govt key decision in cabinet meeting ahead of assembly elections
३५ निर्णय, १७१ शासकीय आदेश! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पुन्हा धडाका

विधानसभेने नगराध्यक्ष व सरपंचांची थेट निवड करण्याची तरतूद असलेले विधेयक विरोधकांच्या विरोधानंतरही मंजूर केले. आता या विधेयकाला विधान परिषदेची मंजुरी आवश्यक असेल. विधान परिषदेत हे विधेयक रोखू शकतो, असा सूर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी लावला आहे. यामुळे नगराध्यक्ष वा सरपंचांच्या थेट निवडणुकीचे भवितव्य काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला. विधान परिषदेने एखादे विधेयक रोखले वा विधानसभेने मंजूर केलेले विधेयक चर्चेलाच घेतले नाही तरी त्याचे कायद्यात रुपांतर होते. तशी घटनेत स्पष्ट तरतूदच आहे.

Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…

घटनेतील तरतूद काय आहे ?

विधिमंडळात विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन सभागृहे असल्यास कोणत्याही विधेयकाला उभय सभागृहांची मान्यता लागते. अपवाद फक्त वित्त विषयक विधेयकांचा असतो. बाकी सर्व विधेयके उभय सभागृहांनी मंजूर करावी लागतात. विधानसभेने मंजूर केलेले एखादे विधेयक विधान परिषदेने फेटाळले अथवा रोखून धरले वा चर्चेलाच घेतले नाही तर त्यावर मार्ग काढण्याची तरतूद घटनेच्या १९७व्या कलमात करण्यात आली आहे. विधानसभेने विधेयक मंजूर केल्यावर ते मंजुरीसाठी विधान परिषदेत पाठविले जाते. विधानसभेने मंजूर केलेले विधेयक विधान परिषदेने रोखून धरले वा तीन महिन्यांच्या कालावधीत चर्चेलाच घेतले नाही तर विधानसभा पुन्हा आहे त्याच स्वरूपात किंवा सुधारणेसह विधेयक दुसऱ्यांदा मंजूर करू शकते. विधानसभेने दुसऱ्यांदा मंजूर केलेले विधेयक पुन्हा विधान परिषदेकडे पाठविले जाते. दुसऱ्यांदा आलेले विधेयक विधान परिषदेने पुन्हा फेटाळले, त्यात सुधारणा सुचविली वा एक महिनाच्या कालावधीत चर्चेलाच घेतले नाही तरी विधानसभेने मंजूर केलेल्या स्वरुपात विधेयक मंजूर झाले असे मानले जाते. त्यानुसार या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होते.

सद्यस्थितीत शिंदे सरकार विधान परिषदेत अल्पमतात असले तरी विधानसभेने मंजूर केलेले विधेयक महाविकास आघाडीने रोखून धरले तरी घटनेतील तरतुदीनुसार ते मंजूर करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे.