लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे नगर मतदारसंघात फिरत नव्हते. पराभव त्यांना बराच जिव्हारी लागलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सक्रिय झाले आहेत आणि ते पुन्हा दौरे करू लागले. आपण संगमनेर व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे जाहीर करून टाकले. संगमनेर हा तर विखे यांचे परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ. थोरात यांनी त्याला प्रत्युत्तर देताना, बालहट्ट पुरवण्याऐवजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच संगमनेरमधून लढावे असे निमंत्रण दिले. त्यानंतर लगेचच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघातून इच्छुक असल्याचा दावा केला. मग मतदारसंघ न राहिलेल्या सुजय विखे यांनी शिवाजी कर्डिले यांची राहुरीतील अखेरची निवडणूक असल्याचे त्यांनीच जाहीर करून टाकले. लोकसभेत पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्यानेच बहुधा सुजय विखे हे विधानसभा निवडणुकीची आगाऊ नोंदणी करीत असल्याची चर्चा सुरू झाली. राजकारणात उद्याची खात्री देता येत नाही आणि विखे पाच वर्षांनंतरचा आतापासूनच विचार करू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा